शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

"ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार"; शहीद अंशुमन सिंह यांच्या पत्नीचे सासू-सासऱ्यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 10:29 IST

सुना घरातून पळून जातात असे अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते.

लखनऊ: ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार असे प्रत्युत्तर शहीद अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती हिने आपल्या सासू-सासऱ्यांना दिले आहे. राष्ट्रपती भवनात ५ जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमात आमचा मुलगा व शहीद जवान कॅप्टन अंशुमन सिंहला राष्ट्र मरणोत्तर कीर्ती चक्र देण्यात आले. त्याची पावतीही आमच्याकडे नाही. सुना घरातून पळून जातात असे अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते.

स्मृती सिंह सध्या पंजाबमध्ये आई- वडिलांकडे गेल्या आहेत. अंशुमनच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपांबाबत त्या म्हणाल्या की, मला काहीही माहिती नाही. स्मृती या बँकर असून, त्यांचे आईवडील शिक्षक आहेत.

आई म्हणते, फोटोशिवाय माझ्याकडे काही नाही

शहीद अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते की, आमच्या शहीद  पुत्राला कीर्ती चक्राच्या रुपाने खूप मोठा सन्मान मिळाला आहे. मी व स्मृती दोघांनी मिळून कीर्ती चक्राचा स्वीकार केला. पण, ते कीर्ती चक्र आमच्याकडे आमच्य नाही. आमची सून त्या सर्व गोष्टी घेऊन गेली. माझ्या मुलाच्या छायाचित्राशिवाय माझ्याकडे आता काहीही नाही.

शहीद अंशुमन सिंह यांच्या माता-पित्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपले म्हणणे त्यांच्या कानावर घातले. त्यांना मदत करण्याचे आश्वासन राहुल यांनी दिले होते.

सरकारकडून मिळाले होते ५० लाख रुपये

■ गेल्या वर्षी जुलै महिन्यात सियाचेनमध्ये आग लागल्याच्या घटनेत आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नांत अंशुमन सिंह शहीद झाले. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्या वारसदारांना ५० लाख रुपयांची मदत मिळाली होती.

■ मात्र, त्यातील ३५ लाख रुपये पत्नी स्मृती हिला मिळाले. आर्मी ग्रुप इन्शुरन्सचे पैसेही स्मृतीनेच घेतले, असा अंशुमन सिंह यांच्या मातापित्याचा दावा आहे.■ या पैशांव्यतिरिक्त भारत व राज्य सरकारकडून आणखी काही पैसे मिळाले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSiachenसियाचिन