शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

DGP पदावरुन हटवलं, गावाकडं जाऊन शेती करणार आयपीएस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 17:26 IST

राव यांना डीजीपी पदावरुन हटविल्यानंतर नीरज सिन्हा यांना राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारचा हा निर्णय न रुचल्याने एमव्ही राव यांनी आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराव यांना डीजीपी पदावरुन हटविल्यानंतर नीरज सिन्हा यांना राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारचा हा निर्णय न रुचल्याने एमव्ही राव यांनी आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रांची - झारखंडचे डीजीपी राहिलेल्या एमव्ही राव यांनी आयपीएस पदाची मोठी नोकरी करुन गावाकडं जाण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीतून व्हीआरएस घेऊन आंध्र प्रदेशातील आपल्या विजयवाडा या गावी जाऊन पूर्वजांची जमीन कसण्याचा निर्णय राव यांनी घेतला आहे. धडाकेबाज आयपीएस अधिकारी राहिलेले एमव्ही राव हे राज्याचे प्रभारी डीजीपी म्हणून कार्यरत होते. गेल्या 11 महिन्यांपासून ते राज्याचे प्रमुख बनून काम पहात होते. मात्र, 11 फेब्रुवारी रोजी त्यांना या पदावरुन हटविण्यात आले. 

राव यांना डीजीपी पदावरुन हटविल्यानंतर नीरज सिन्हा यांना राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारचा हा निर्णय न रुचल्याने एमव्ही राव यांनी आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राव यांची अजून 6 महिने नोकरी शिल्लक आहे. बिहारच्या जहानाबाद येथे एएसपीपासून ते झारखंडचे पोलीस महासंचालक पदापर्यंत राव यांनी सेवा बजावली. एमव्ही राव यांनी आपल्या 34 वर्षांच्या सेवेत बिहारमध्ये भागवत झा आझाद, जगरनाथ मिश्रा, लालू प्रसाद यादव यांच्यापासून ते विद्यमान हेमंत सोरेन सरकारमध्येही अनेक महत्त्वपूर्ण पदांवर सेवा बजावली. मात्र, याच महिन्यात त्यांना डीजीपी पदावरुन हटविण्यात आले आहे. 

डीजीपी पदावरु हटविण्यात आल्यानंतर राव यांनी अद्यापही मीडियासमोर आपली भूमिका मांडली नाही. मात्र, आजतक या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बिहारचं भरभरुन कौतुक केलं. तसेच, आपल्या कार्यकाळात कमी मनुष्यबळ, जुनीच हत्यारं आणि जुन्या गाड्यांचा उल्लेख करत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. 

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहारFarmerशेतकरीAndhra Pradeshआंध्र प्रदेश