शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

घटनेच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द हटवा, सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 15:27 IST

कुठल्याही व्यक्तीला सेक्युलर होण्यास भाग पाडता येणार नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षावर समाजवादी विचार मानण्याचे बंधन घालता येऊ शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली -  भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्दांचा १९७६ मध्ये घटनादुरुस्ती करून समावेश करण्यात आला होता. दरम्यान, ४४ वर्षांपूर्वी झालेल्या या घटनादुरुस्तीला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. घटनादुरुस्ती करून घटनेत समाविष्ट करण्यात आलेले हे शब्द हटवण्यात यावेत, अशी मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.

१९७६ मध्ये  घटनेमध्ये करण्यात आलेला हा बदल घटनेतील सिद्धांत आणि भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विषय वस्तूच्या विपरित होता. सेक्युलॅरिझम आणि समाजवाद हा राजकीय विचार आहे, तो जनतेवर लादता येणार नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

राजकीय पक्षांनासुद्धा नोंदणी करताना धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी असण्यास सहमती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच या याचिकेमधन लोकप्रतिनिधित्व कायद्यामधील सेक्शन २९ ए (५) मध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी शब्द जोडण्यासही आव्हा देण्यात आले आहे. कुठल्याही व्यक्तीला सेक्युलर होण्यास भाग पाडता येणार नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षावर समाजवादी विचार मानण्याचे बंधन घालता येणार नाही, त्यामुळे  Representation of People Act 1951 मध्ये करण्यात आलेल्या या शब्दांचा समावेश हा घटनेच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधात जाणारा आहे, असेही म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकील बलराम सिंह आणि करुणेश कुमार शुक्ला व समाजसेवक प्रवीण कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. या य याचिकेमधून ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे घटनेच्या प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या शब्दांना हटवण्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ही याचिका विष्णू शंकर जैन यांनी दाखल केली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत