शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

घटनेच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द हटवा, सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 15:27 IST

कुठल्याही व्यक्तीला सेक्युलर होण्यास भाग पाडता येणार नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षावर समाजवादी विचार मानण्याचे बंधन घालता येऊ शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली -  भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्दांचा १९७६ मध्ये घटनादुरुस्ती करून समावेश करण्यात आला होता. दरम्यान, ४४ वर्षांपूर्वी झालेल्या या घटनादुरुस्तीला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. घटनादुरुस्ती करून घटनेत समाविष्ट करण्यात आलेले हे शब्द हटवण्यात यावेत, अशी मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.

१९७६ मध्ये  घटनेमध्ये करण्यात आलेला हा बदल घटनेतील सिद्धांत आणि भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विषय वस्तूच्या विपरित होता. सेक्युलॅरिझम आणि समाजवाद हा राजकीय विचार आहे, तो जनतेवर लादता येणार नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

राजकीय पक्षांनासुद्धा नोंदणी करताना धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी असण्यास सहमती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच या याचिकेमधन लोकप्रतिनिधित्व कायद्यामधील सेक्शन २९ ए (५) मध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी शब्द जोडण्यासही आव्हा देण्यात आले आहे. कुठल्याही व्यक्तीला सेक्युलर होण्यास भाग पाडता येणार नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षावर समाजवादी विचार मानण्याचे बंधन घालता येणार नाही, त्यामुळे  Representation of People Act 1951 मध्ये करण्यात आलेल्या या शब्दांचा समावेश हा घटनेच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधात जाणारा आहे, असेही म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकील बलराम सिंह आणि करुणेश कुमार शुक्ला व समाजसेवक प्रवीण कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. या य याचिकेमधून ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे घटनेच्या प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या शब्दांना हटवण्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ही याचिका विष्णू शंकर जैन यांनी दाखल केली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत