शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

Remdesivir: दररोजच्या १० हजार लसींवरून ३.२५ लाखांपर्यंत वाढले उत्पादन, भारताने अशी दूर केली रेमडेसिविरची टंचाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 18:29 IST

Coronavirus in India : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती.

ठळक मुद्देरेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे दिले आदेशमात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले१० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना तासनतास उभे राहूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. तसेच टंचाई निर्माण झाल्याने रेमडेसिविरच्या काळ्याबाजारालाही सुरुवात झाली होती. रेमडेसिविरच्या टंचाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीकाही झाली. त्यानंतर रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले होते. अखेरीस आता देशातील रेमडेसिविरचे दैनंदिन उत्पादन १० हजार लसींवरून ३.२५ लाख लसींपर्यंत पोहोचले आहे. (Production increased from 10,000 vaccines per day to 3.25 lakh, India solved shortage of remdesivir)

सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि वाढीव लसी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले गेले. रेमडेसिविरची मागणी वाढल्यानंतर सरकारने २ एप्रिलला एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये खासगी कंपन्यांनी रेमडेसिविरच्या उत्पादनाची आपल्याकडे पुरेसी क्षमता असल्याचे सांगितले. मात्र या औषधाला फार मागणी नसल्याने त्याचे उत्पादन कमी ठेवण्याची माहिती दिली.  

औषध कंपन्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रेमडेसिविरची उत्पादन क्षमता ३६ लाख एवढी होती. मात्र कंपन्या मागणीसुनार केवळ ५ ते ६ लाख लसींचेच उत्पादन करत होते. मात्र रेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे आदेश दिले.  

मात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले. त्यातून साठेबाजी आणि काळ्या बाजाराला सुरुवात झाली. त्यामुळे विविध राज्य सरकारांनी राज्यात उत्पादित होणाऱ्या रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातली. रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्याचे आव्हान सरकारसमोर होते. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आम्ही याचा विचार केला की, ज्या कंपनीकडे आवश्यक कच्चा माल आणि डब्ल्यूएचओकडून मिळालेली औषध निर्मितीची परवानगी दिली पाहिजे. केंद्राने २४ तासांत तशी परवानगी दिली. १० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली. 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यmedicinesऔषधं