शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Remdesivir: दररोजच्या १० हजार लसींवरून ३.२५ लाखांपर्यंत वाढले उत्पादन, भारताने अशी दूर केली रेमडेसिविरची टंचाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 18:29 IST

Coronavirus in India : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती.

ठळक मुद्देरेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे दिले आदेशमात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले१० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना तासनतास उभे राहूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. तसेच टंचाई निर्माण झाल्याने रेमडेसिविरच्या काळ्याबाजारालाही सुरुवात झाली होती. रेमडेसिविरच्या टंचाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीकाही झाली. त्यानंतर रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले होते. अखेरीस आता देशातील रेमडेसिविरचे दैनंदिन उत्पादन १० हजार लसींवरून ३.२५ लाख लसींपर्यंत पोहोचले आहे. (Production increased from 10,000 vaccines per day to 3.25 lakh, India solved shortage of remdesivir)

सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि वाढीव लसी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले गेले. रेमडेसिविरची मागणी वाढल्यानंतर सरकारने २ एप्रिलला एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये खासगी कंपन्यांनी रेमडेसिविरच्या उत्पादनाची आपल्याकडे पुरेसी क्षमता असल्याचे सांगितले. मात्र या औषधाला फार मागणी नसल्याने त्याचे उत्पादन कमी ठेवण्याची माहिती दिली.  

औषध कंपन्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रेमडेसिविरची उत्पादन क्षमता ३६ लाख एवढी होती. मात्र कंपन्या मागणीसुनार केवळ ५ ते ६ लाख लसींचेच उत्पादन करत होते. मात्र रेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे आदेश दिले.  

मात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले. त्यातून साठेबाजी आणि काळ्या बाजाराला सुरुवात झाली. त्यामुळे विविध राज्य सरकारांनी राज्यात उत्पादित होणाऱ्या रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातली. रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्याचे आव्हान सरकारसमोर होते. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आम्ही याचा विचार केला की, ज्या कंपनीकडे आवश्यक कच्चा माल आणि डब्ल्यूएचओकडून मिळालेली औषध निर्मितीची परवानगी दिली पाहिजे. केंद्राने २४ तासांत तशी परवानगी दिली. १० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली. 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यmedicinesऔषधं