शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

Remdesivir: दररोजच्या १० हजार लसींवरून ३.२५ लाखांपर्यंत वाढले उत्पादन, भारताने अशी दूर केली रेमडेसिविरची टंचाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 18:29 IST

Coronavirus in India : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती.

ठळक मुद्देरेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे दिले आदेशमात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले१० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना तासनतास उभे राहूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. तसेच टंचाई निर्माण झाल्याने रेमडेसिविरच्या काळ्याबाजारालाही सुरुवात झाली होती. रेमडेसिविरच्या टंचाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीकाही झाली. त्यानंतर रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले होते. अखेरीस आता देशातील रेमडेसिविरचे दैनंदिन उत्पादन १० हजार लसींवरून ३.२५ लाख लसींपर्यंत पोहोचले आहे. (Production increased from 10,000 vaccines per day to 3.25 lakh, India solved shortage of remdesivir)

सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि वाढीव लसी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले गेले. रेमडेसिविरची मागणी वाढल्यानंतर सरकारने २ एप्रिलला एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये खासगी कंपन्यांनी रेमडेसिविरच्या उत्पादनाची आपल्याकडे पुरेसी क्षमता असल्याचे सांगितले. मात्र या औषधाला फार मागणी नसल्याने त्याचे उत्पादन कमी ठेवण्याची माहिती दिली.  

औषध कंपन्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रेमडेसिविरची उत्पादन क्षमता ३६ लाख एवढी होती. मात्र कंपन्या मागणीसुनार केवळ ५ ते ६ लाख लसींचेच उत्पादन करत होते. मात्र रेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे आदेश दिले.  

मात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले. त्यातून साठेबाजी आणि काळ्या बाजाराला सुरुवात झाली. त्यामुळे विविध राज्य सरकारांनी राज्यात उत्पादित होणाऱ्या रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातली. रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्याचे आव्हान सरकारसमोर होते. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आम्ही याचा विचार केला की, ज्या कंपनीकडे आवश्यक कच्चा माल आणि डब्ल्यूएचओकडून मिळालेली औषध निर्मितीची परवानगी दिली पाहिजे. केंद्राने २४ तासांत तशी परवानगी दिली. १० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली. 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यmedicinesऔषधं