शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Remdesivir: दररोजच्या १० हजार लसींवरून ३.२५ लाखांपर्यंत वाढले उत्पादन, भारताने अशी दूर केली रेमडेसिविरची टंचाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 18:29 IST

Coronavirus in India : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती.

ठळक मुद्देरेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे दिले आदेशमात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले१० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना तासनतास उभे राहूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. तसेच टंचाई निर्माण झाल्याने रेमडेसिविरच्या काळ्याबाजारालाही सुरुवात झाली होती. रेमडेसिविरच्या टंचाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीकाही झाली. त्यानंतर रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले होते. अखेरीस आता देशातील रेमडेसिविरचे दैनंदिन उत्पादन १० हजार लसींवरून ३.२५ लाख लसींपर्यंत पोहोचले आहे. (Production increased from 10,000 vaccines per day to 3.25 lakh, India solved shortage of remdesivir)

सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि वाढीव लसी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले गेले. रेमडेसिविरची मागणी वाढल्यानंतर सरकारने २ एप्रिलला एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये खासगी कंपन्यांनी रेमडेसिविरच्या उत्पादनाची आपल्याकडे पुरेसी क्षमता असल्याचे सांगितले. मात्र या औषधाला फार मागणी नसल्याने त्याचे उत्पादन कमी ठेवण्याची माहिती दिली.  

औषध कंपन्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रेमडेसिविरची उत्पादन क्षमता ३६ लाख एवढी होती. मात्र कंपन्या मागणीसुनार केवळ ५ ते ६ लाख लसींचेच उत्पादन करत होते. मात्र रेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे आदेश दिले.  

मात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले. त्यातून साठेबाजी आणि काळ्या बाजाराला सुरुवात झाली. त्यामुळे विविध राज्य सरकारांनी राज्यात उत्पादित होणाऱ्या रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातली. रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्याचे आव्हान सरकारसमोर होते. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आम्ही याचा विचार केला की, ज्या कंपनीकडे आवश्यक कच्चा माल आणि डब्ल्यूएचओकडून मिळालेली औषध निर्मितीची परवानगी दिली पाहिजे. केंद्राने २४ तासांत तशी परवानगी दिली. १० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली. 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यmedicinesऔषधं