शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

धर्म नको संघर्षाचे कारण

By admin | Updated: January 26, 2015 03:30 IST

एकता शक्ती आहे आणि प्रभुत्व दुर्बलता आहे़ भारताची प्रज्ञा आपणास हेच शिकवते़ धर्म संघर्षाचे कारण बनता कामा नये,

नवी दिल्ली : एकता शक्ती आहे आणि प्रभुत्व दुर्बलता आहे़ भारताची प्रज्ञा आपणास हेच शिकवते़ धर्म संघर्षाचे कारण बनता कामा नये, असे प्रतिपादन ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज रविवारी केले़‘धर्म ऐक्याची शक्ती आहे़ आपण याला संघर्षाचे कारण बनू देऊ शकत नाही’, या महात्मा गांधी यांच्या वचनाचे स्मरण करून देत, देशातील विविध धर्मसमुदायातील परस्पर सहकार्य आणि सद्भावनेवर राष्ट्रपतींनी यावेळी भर दिला़ ते म्हणाले की, लोकशाहीने बहाल केलेले स्वातंत्र्य कधीकधी उन्माद निर्माण करते़ हा उन्माद आपल्या पारंपरिक प्रकृतिविरुद्ध आहे़ शब्दांचा हिंसाचार दु:ख, वेदना देऊन लोकांच्या भावना दुखावते़ गांधीजी म्हणायचे, धर्म ऐक्याची शक्ती आहे़ ते संघर्षाचे कारण बनता कामा नये़ भारताने कायम सर्वधर्मसमभावावर विश्वास ठेवला आहे़ हा सर्वधर्मसमभाव हीच भारताची खरी ओळख आहे़भारतीय राज्यघटना लोकशाहीचे पवित्र पुस्तक आहे़ भारताच्या राज्यघटनेने सर्वधर्मसमभाव शिकवला़ विविध धर्मसमुदायातील सहशनशीलता, सद्भावना वाढवली़ आता या मूल्यांची अधिक सावधगिरीने जपणूक करण्याची गरज आहे़देशात धर्मांतराच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना आणि काही हिंदुत्ववादी संघटना व पक्षांकडून महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे याचे महिमा पठण सुरू असताना, राष्ट्रपतींनी सर्वधर्मसमभावावर भाष्य करणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे़दहशतवादाच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्ताला लक्ष्य केले़ भारत आपल्या शत्रूंबाबत गाफिल राहण्याचा धोका पत्करू शकत नाही़ शांती, अहिंसा आणि एक उत्तम शेजारी देश भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्त्वे आहेत़ पण भारताच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणाऱ्या शत्रूंपासून भारत गाफिल राहू शकत नाही़ भारत आणि भारताच्या जनतेविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या शत्रूंना नामोहरम करण्याची सर्व शक्ती आमच्याकडे आहे, असे राष्ट्रपती म्हणाले़महिलांवरील अत्याचार, बलात्कार, हुंड्यासाठी त्यांचा छळ या सामाजिक कुप्रथांवरही राष्ट्रपतींनी प्रहार केला़ बलात्कार, रस्त्यांवर महिलांची काढली जाणारी छेड, हुंड्यासाठी तिची हत्या यामुळे महिलांना भयभीत केले आहे़ हे बघणे दु:खदायी आहे़ महिलांचा सन्मान करणारा आणि त्यांना सक्षम करणारा देशच एक जागतिक शक्ती बनू शकतो़ म्हणूनच प्रत्येक भारतीयाने महिलांना कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून बचाव करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले़