तेल साखरेसह भाजीपाल्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30

- सोन्या-चांदीचे भाव कमी झाल्याने लग्नघरी आनंदाचे वातावरण

Relief for the people due to fall in vegetable prices, with oilseed | तेल साखरेसह भाजीपाल्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

तेल साखरेसह भाजीपाल्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

-
ोन्या-चांदीचे भाव कमी झाल्याने लग्नघरी आनंदाचे वातावरण
तळेगाव, ता. जामनेर : बाजारात तेलाचे ६५ रु. किलो तर साखर २५ रू. किलो, बटाटे ५ ते ८ रु. किलो मिळत आहेत. वांगी ५ रु. व कोबी १० रु. किलो असे भाव असल्याने सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महागाईने सर्वसामान्य आता पर्यंत होरपळत होते. मात्र जामनेर बाजारपेठेत साखरेचे किरकोळ भाव २५ रू. किलो तर तेल ६५ रु. किलोचे फलक दुकानावर लागत असून किराणामध्ये इतर वस्तुंचे भाव कमी झाल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात लग्नसराईत सुरू असून या कमी झालेल्या भावाचा फायदा लग्नसराईत सुरू असून या कमी झालेल्या भावाचा फायदा लग्न करणार्‍यांना होत आहे. याचसोबत सोन्याचांदीच्या भावातही घसरण झाल्याने किरकोळ बाजारात सोने २६५० रू. ग्रॅम तर चांदी ३६५०० रू. किलो असून भाव कमी झाल्याचा फायदा वधु-वर पित्यांना होत आहे.
त्याचप्रमाणे भाजीपाला मार्केटमध्ये बटाटयाचे भाव कमी झाल्याने गृहीणी मोठ्या प्रमाणात बटाटे घरी घेऊन जावून चिप्स बनवायचे काम सुरू केले आहे. बटाटा अवघ्या ८ ते १० रु. किलो मिळत आहे. तसेच वांगी ५ रु. किलो तर कोबी १० रु. किलो आहे. कांदा १० ते १५ रु. किलो मिळत असल्याने मिरची वगळता इतर भाजीपाल्याचे भाव खाली आले आहेत.
बाजार पेठेतील या कमी झालेल्या भावामुळे मात्र सर्वसामान्य अगदी आनंदात असून हे भाव असे राहावे अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

Web Title: Relief for the people due to fall in vegetable prices, with oilseed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.