शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अटकेतील शेतकऱ्यांना सोडा, नंतरच सरकारशी चर्चा करू! राकेश टिकैत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:25 IST

Farmer Protest : आम्ही केवळ तिन्ही कृषी कायदे परत घ्या म्हणतोय, सिंहासन मागितले तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारचा तणाव वाढविला आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली - आम्ही केवळ तिन्ही कृषी कायदे परत घ्या म्हणतोय, सिंहासन मागितले तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारचा तणाव वाढविला आहे. दिल्लीच्या सीमेवर मागण्यांसाठी अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज ७० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. गेल्या दोन महिन्यात मंत्रीगट आणि शेतकरी नेत्यांमध्ये १२ बैठका झाल्यात. शेतकरी ऐकत नाही म्हणून वैतागून कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी यापुढे बैठका नाहीत, असे संकेत दिले होते. त्यानंतर आंदोलन उधळण्याचा प्रयत्न झाला. २६ जानेवारीला हिंसाचार झाला. दुबळे आंदोलन पुन्हा जोर धरायला लागले त्यामुळे सरकारने रस्त्यांवर खिळे, काटेरी तारा खोवून शेतकऱ्यांचा रस्ताच बंद केला आहे. आता आंदोलनात पुन्हा गर्दी वाढली. सरकारला वाटते शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी व्हाव्यात, परंतु शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले जोपर्यंत अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडण्यात येत नाही तोपर्यंत आमची सरकारसोबत चर्चा नाही.शरद पवारांची, राऊतांची भेट!दिल्लीत आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आज शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. हिंसाचारास जवाबदार असलेला दीप सिद्धू याला अटक करावी, दिल्ली पोलिसांकडून रस्त्यावर ठोकण्यात आलेले खिळे, उभारण्यात आलेले सुरक्षाकड्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा यासाठी पवारांना विनंती करण्यात आली. शिष्टमंडळात संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे, लक्ष्मण वांगे, अरुण कान्होरे तसेच केशव बोडके यांचा समावेश होता.२२० शेतकरी बेपत्ता!२६ जानेवारीच्या हिंसाचारानंतर जवळपास २२० आंदोलनकर्तेबेपत्ता आहेत. यातील केवळ १३५ आंदोलकांची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. परंतु, उर्वरित आंदोलकांची माहिती पोलिसांकडून दिली जात नाही. या आंदोलकांना तिहाड कारागृहात डांबले असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.अद्याप सिंहासन मागितले नाही!गाजीपूर, सिंघू आणि टिकरी सीमेवर दररोज शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यांना रोखण्यासाठी सरकारने अनेक प्रकारे प्रयत्न केले. तरीही गाझीपूर येथे आंदोलकांची गर्दी वाढत आहे. आज रोहतक व जींद इथे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची महापंचायत झाली. त्यात शेतकऱ्यांना सोडेपर्यंत सरकारशी चर्चा करायची नाही असा निर्णय घेण्यात आला. टिकैत म्हणाले, आम्ही केंद्राला केवळ कृषी कायदे परत घ्या व एमएसपी कायदा करा असे सांगत आहोत.त्यात तमाम शेतकऱ्यांचे हित आहे. तरीही सरकार आमच्याशी इतकी क्रूरपणे वागते. जर आम्ही सिंहासनच परत मागीतले तर सरकारची अवस्था कशी होईल. दीप सिद्धूंना पकडण्यासाठी  लाखांचे बक्षीस टि्वटरवर कारवाई करण्याचा केंद्राचा इशारा गदारोळ माजविणारे आपचे तीन खासदार एक दिवसासाठी निलंबित  रॅलीत हिंसाचार : चौकशीची याचिका दाखल करून घेण्यास कोर्टाचा नकार

टॅग्स :Farmerशेतकरीrakesh tikaitराकेश टिकैत