शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अटकेतील शेतकऱ्यांना सोडा, नंतरच सरकारशी चर्चा करू! राकेश टिकैत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:25 IST

Farmer Protest : आम्ही केवळ तिन्ही कृषी कायदे परत घ्या म्हणतोय, सिंहासन मागितले तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारचा तणाव वाढविला आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली - आम्ही केवळ तिन्ही कृषी कायदे परत घ्या म्हणतोय, सिंहासन मागितले तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारचा तणाव वाढविला आहे. दिल्लीच्या सीमेवर मागण्यांसाठी अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज ७० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. गेल्या दोन महिन्यात मंत्रीगट आणि शेतकरी नेत्यांमध्ये १२ बैठका झाल्यात. शेतकरी ऐकत नाही म्हणून वैतागून कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी यापुढे बैठका नाहीत, असे संकेत दिले होते. त्यानंतर आंदोलन उधळण्याचा प्रयत्न झाला. २६ जानेवारीला हिंसाचार झाला. दुबळे आंदोलन पुन्हा जोर धरायला लागले त्यामुळे सरकारने रस्त्यांवर खिळे, काटेरी तारा खोवून शेतकऱ्यांचा रस्ताच बंद केला आहे. आता आंदोलनात पुन्हा गर्दी वाढली. सरकारला वाटते शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी व्हाव्यात, परंतु शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले जोपर्यंत अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडण्यात येत नाही तोपर्यंत आमची सरकारसोबत चर्चा नाही.शरद पवारांची, राऊतांची भेट!दिल्लीत आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आज शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. हिंसाचारास जवाबदार असलेला दीप सिद्धू याला अटक करावी, दिल्ली पोलिसांकडून रस्त्यावर ठोकण्यात आलेले खिळे, उभारण्यात आलेले सुरक्षाकड्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा यासाठी पवारांना विनंती करण्यात आली. शिष्टमंडळात संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे, लक्ष्मण वांगे, अरुण कान्होरे तसेच केशव बोडके यांचा समावेश होता.२२० शेतकरी बेपत्ता!२६ जानेवारीच्या हिंसाचारानंतर जवळपास २२० आंदोलनकर्तेबेपत्ता आहेत. यातील केवळ १३५ आंदोलकांची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. परंतु, उर्वरित आंदोलकांची माहिती पोलिसांकडून दिली जात नाही. या आंदोलकांना तिहाड कारागृहात डांबले असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.अद्याप सिंहासन मागितले नाही!गाजीपूर, सिंघू आणि टिकरी सीमेवर दररोज शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यांना रोखण्यासाठी सरकारने अनेक प्रकारे प्रयत्न केले. तरीही गाझीपूर येथे आंदोलकांची गर्दी वाढत आहे. आज रोहतक व जींद इथे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची महापंचायत झाली. त्यात शेतकऱ्यांना सोडेपर्यंत सरकारशी चर्चा करायची नाही असा निर्णय घेण्यात आला. टिकैत म्हणाले, आम्ही केंद्राला केवळ कृषी कायदे परत घ्या व एमएसपी कायदा करा असे सांगत आहोत.त्यात तमाम शेतकऱ्यांचे हित आहे. तरीही सरकार आमच्याशी इतकी क्रूरपणे वागते. जर आम्ही सिंहासनच परत मागीतले तर सरकारची अवस्था कशी होईल. दीप सिद्धूंना पकडण्यासाठी  लाखांचे बक्षीस टि्वटरवर कारवाई करण्याचा केंद्राचा इशारा गदारोळ माजविणारे आपचे तीन खासदार एक दिवसासाठी निलंबित  रॅलीत हिंसाचार : चौकशीची याचिका दाखल करून घेण्यास कोर्टाचा नकार

टॅग्स :Farmerशेतकरीrakesh tikaitराकेश टिकैत