शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनमानी अटकेला कोर्टाचा लगाम

By admin | Updated: July 4, 2014 04:26 IST

सात वर्षे किंवा त्याहून कमी कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपीस अटक करण्याची खरेच गरज आहे

नवी दिल्ली : सात वर्षे किंवा त्याहून कमी कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपीस अटक करण्याची खरेच गरज आहे का याचा सारासार विचार पोलिसांनी करावा आणि अटक करण्यास सबळ कारणे असतील तर त्याची लेखी नोंद करून मगच आरोपीस अटक केली जावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.पोलिसांनी अटक करून आरोपीस रिमांडसाठी न्यायालयात उभे केल्यावर दंडाधिकाऱ्यांनी त्याची अटक खरोखरच सबळ कारणासाठी केलेली आहे की नाही याची शहानिशा करावी आणि अटक समर्थनीय असेल तरच आरोपीला रिमांड द्यावा, असेही न्यायालयाने सांगितले आहे.अशा गुन्ह्यांसाठी करायच्या अटकेच्या निकषांविषयी सर्व राज्य सरकारांनी आपापल्या पोलीस दलांना आवश्यक ते निर्देश द्यावे, असे नमूद करून न्यायालयाने अशी ताकीद दिली की, यापुढे सबळ कारणाविना अटक केल्याचे प्रकरण दिसून आले तर संबंधित पोलीस अधिकारी व दंडाधिकारी यांच्यावर न्यायालयीन अवमानाची (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) कारवाई केली जाईल.खरेतर अशा गुन्ह्यांच्या प्रकरणात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या मनमानी अटकांना आळा बसावा यासाठी २०१०मध्ये दंड प्रक्रिया संहितेत दुरुस्ती करून कलम ४१(ए) आणि (बी) यांचा समावेश केला गेला. त्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी अटक करणे समर्थनीय आहे की नाही हे ठरविण्यासाठी नऊ विविध निकष ठरवून दिले गेले. तरीही पोलिसांची वृत्ती बदललेली नाही, असे निदर्शनास आल्यानंतर न्या. चंद्रमौली कुमार प्रसाद व न्या. पिनाकी चंद्र घोष यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला. थोडक्यात, पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये, केवळ अटक करण्याचा अधिकार आहे म्हणून यंत्रवत पद्धतीने अटक न करता कलम ४१मधील निकषांचे कसोशीने पालन करावे, असे बजावले आहे.हा आदेश या वर्गात बसणाऱ्या सर्वच गुन्ह्यांमधील अटकेसाठी असला तरी, अटकेच्या अधिकाराचा कशा प्रकारे दुरुपयोग केला जातो हे दाखविण्यासाठी न्यायालयाने प्रामुख्याने भादंवि कलम ४९८ ए (हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणे) अन्वये गुन्ह्यांच्या प्रकरणांचे विवेचन केले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या २०१२च्या आकडेवारीचा संदर्भ देत खंडपीठाने म्हटले की, या कलमान्वये या एकाच वर्षात देशात पाच हजार महिलांसह एकूण दोन लाख व्यक्तींना आरोपी म्हणून आटक केली गेली. अशा खटल्यांमध्ये तपासानंतर आरोपपत्र दाखल केले जाण्याचे प्रमाण ९३.६ टक्के एवढे असले तरी खटल्यात आरोपी दोषी ठरून त्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण जेमतेम १५ टक्के आहे. सध्या असे ३.७२ लाख खटले देशभर प्रलंबित असून सध्याचा रोख पाहता त्यापैकी ३.१७ लाख खटल्यांमध्ये आरोपी निर्दोष मुक्त होण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)