शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

अब की बार, प्रादेशिक पक्षांवर मदार; 'हे' पक्ष किंगमेकर ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 10:03 IST

लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्ष बजावणार महत्त्वाची भूमिका

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय धुळवूड रंगात आली आहे. सत्तेचे रंग नेमके कोणाच्या नशिबी येणार, याचा फैसला दोन महिन्यात होणार आहे. मात्र यंदा राष्ट्रीय पक्षांच्या सत्तेच्या स्वप्नात रंग भरण्यात प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रादेशिक पक्षांचा दबदबा वाढला आहे. त्यामुळे यंदा भाजपा, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना सत्तेचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मदत लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष किंगमेकर ठरू शकतात. 2014 मध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. तब्बल दोन दशकांनंतर जनतेनं एका पक्षाला स्पष्ट कौल दिला. भाजपानं बहुमताचा आकडा पार केला. त्यांना 282 जागा मिळाल्या. भाजपानं मित्रपक्षांसह सत्ता स्थापन केली. मित्रपक्षांमुळे एनडीएचं संख्याबळ 336 वर पोहोचलं. मात्र यंदा निवडणुकीपूर्वी आलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणं अवघड आहे. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये एनडीएमधील काही घटक पक्षांनी साथ सोडल्यानं यंदा प्रादेशिक पक्षांची चांदी होऊ शकते. उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत भाजपानं 80 पैकी 71 जागा मिळवल्या होत्या. मात्र यंदा समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीनं आघाडी करत भाजपासमोर आव्हान उभं केलं आहे. बिहारमध्ये तर जवळपास संपूर्ण राजकीय परिघ प्रादेशिक पक्षांनी व्यापून टाकला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधात असलेला संयुक्त जनता दल आता भाजपासोबत आहे. संयुक्त जनता दलाचे जास्त आमदार असल्यानं त्या जोरावर त्यांनी अधिक जागा मागितल्या. विरोधकांच्या महाआघाडीचा सामना करण्यासाठी भाजपाला संयुक्त जनता दलाच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या. त्यासाठी भाजपाला आपल्या विद्यमान खासदारांची तिकीटं कापावी लागणार आहेत. महाराष्ट्रातही शिवसेनेनं भाजपाला जेरीस आणलं. काँग्रेस-राष्ट्रवादीचा सामना करण्यासाठी भाजपानं शिवसेनेसोबत युती केली. शिवसेनेनं गेल्या चार वर्षांपासून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. युतीनंतरही शिवसेनेचा मोदीविरोध कायम आहे. निवडणुकीनंतर एनडीए पंतप्रधान ठरवेल, असं विधान काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला यंदा चांगलं यश मिळण्याचा अंदाज आहे. मात्र तिथे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील. निवडणुकीनंतर त्यांची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.ईशान्य भारतात भाजपानं अनेक लहान पक्षांसोबत आघाड्या केल्या आहेत. तमिळनाडूतही प्रादेशिक पक्षांभोवती निवडणूक फिरेल. ओदिशात बिजू जनता दल आणि तेलंगणात टीआरएसला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. हे दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर काय करणार, याची उत्सुकता आहे. कर्नाटकात जेडीएस काँग्रेससोबत सत्तेत आहे. हे दोन्ही पक्ष भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र निवडणुकीनंतर जेडीएसची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेस