शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

निवडणूक आयोगावरील ताशेरे हटविण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 2:00 AM

सुप्रीम कोर्ट; माध्यमांना वार्तांकनाचा अधिकार

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असून अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करायला हवे, अशी कठोर टीका मद्रास उच्च न्यायालयाने केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने  निवडणूक आयोगावर केलेल्या कठोर टीकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूती व्यक्त केली. मात्र, न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केलेली टीकात्मक मते हटविण्यास स्पष्टपणे नकार दिला. तसेच सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या टिप्पणींचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध घालण्याची निवडणूक आयोगाची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असून अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करायला हवे, अशी कठोर टीका मद्रास उच्च न्यायालयाने केली होती. त्याविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या टीकेमुळे आयोगाच्या प्रतिमेला तडा गेला असून न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आलेली मते किंवा टिप्पणींचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध करावा, अशी मागणी आयोगाने केली होती. त्यावर सुनावणी करताना न्या. डी. वाय. चंद्रचूड आण‍ि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने म्हटले, की उच्च न्यायालयाची टिप्पणी कठोर होती हे मान्य आहे. मात्र, न्यायालयाच्या मतांमधून सर्वसामान्य जनतेच्या भावना व्यक्त होत असतात. जनतेच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यात उच्च न्यायालयांची कायम महत्त्वाची भूमिका राहिली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जनतेच्या हितांशी जुळलेल्या प्रकरणांमध्ये कटू प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. आम्हाला उच्च न्यायालयांचे पावित्र्य जपायचे आहे. मद्रास उच्च न्यायालयाची टिप्पणी कडू औषधाप्रमाणे मानून घ्यावी, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने आयोगाची समजूतही घातली.

माध्यमांना स्वातंत्र्यn उच्च न्यायालयाची टिप्पणी न्यायालयीन आदेशात नमूद केलेली नसल्यामुळे ती हटविता येणार नाही.   राज्यघटनेने जनतेला बोलण्याचे आण‍ि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तेच स्वातंत्र्य माध्यमांनाही आहे. n माध्यमांच्या स्वातंत्र्याचे आम्ही समर्थक आहोत. माध्यमांनी संपूर्ण सुनावणीचे वार्तांकन करायला हवे. नागरिकांना न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान काय घडले. सुनावणीदरम्यान होणारे दावे, प्रतिदावे व न्यायालयाची निरिक्षणे तसेच प्रश्न याबाबत माहिती मिळावी, हा नागरिकांचा अधिकार आहे. n ही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध झाली पाहिजे आणि त्यामुळेच माध्यमांना वार्तांकनापासून रोखणे प्रतिगामी ठरेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक