शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

निवडणूक आयोगावरील ताशेरे हटविण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 02:00 IST

सुप्रीम कोर्ट; माध्यमांना वार्तांकनाचा अधिकार

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असून अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करायला हवे, अशी कठोर टीका मद्रास उच्च न्यायालयाने केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने  निवडणूक आयोगावर केलेल्या कठोर टीकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूती व्यक्त केली. मात्र, न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केलेली टीकात्मक मते हटविण्यास स्पष्टपणे नकार दिला. तसेच सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या टिप्पणींचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध घालण्याची निवडणूक आयोगाची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असून अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करायला हवे, अशी कठोर टीका मद्रास उच्च न्यायालयाने केली होती. त्याविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या टीकेमुळे आयोगाच्या प्रतिमेला तडा गेला असून न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आलेली मते किंवा टिप्पणींचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध करावा, अशी मागणी आयोगाने केली होती. त्यावर सुनावणी करताना न्या. डी. वाय. चंद्रचूड आण‍ि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने म्हटले, की उच्च न्यायालयाची टिप्पणी कठोर होती हे मान्य आहे. मात्र, न्यायालयाच्या मतांमधून सर्वसामान्य जनतेच्या भावना व्यक्त होत असतात. जनतेच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यात उच्च न्यायालयांची कायम महत्त्वाची भूमिका राहिली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जनतेच्या हितांशी जुळलेल्या प्रकरणांमध्ये कटू प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. आम्हाला उच्च न्यायालयांचे पावित्र्य जपायचे आहे. मद्रास उच्च न्यायालयाची टिप्पणी कडू औषधाप्रमाणे मानून घ्यावी, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने आयोगाची समजूतही घातली.

माध्यमांना स्वातंत्र्यn उच्च न्यायालयाची टिप्पणी न्यायालयीन आदेशात नमूद केलेली नसल्यामुळे ती हटविता येणार नाही.   राज्यघटनेने जनतेला बोलण्याचे आण‍ि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तेच स्वातंत्र्य माध्यमांनाही आहे. n माध्यमांच्या स्वातंत्र्याचे आम्ही समर्थक आहोत. माध्यमांनी संपूर्ण सुनावणीचे वार्तांकन करायला हवे. नागरिकांना न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान काय घडले. सुनावणीदरम्यान होणारे दावे, प्रतिदावे व न्यायालयाची निरिक्षणे तसेच प्रश्न याबाबत माहिती मिळावी, हा नागरिकांचा अधिकार आहे. n ही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध झाली पाहिजे आणि त्यामुळेच माध्यमांना वार्तांकनापासून रोखणे प्रतिगामी ठरेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक