शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

13 हजार विहिरींचे पुनर्भरण

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

र्शावण क्षीरसागर : सांगोला तालुक्यातून 59 गावांचा समावेश

र्शावण क्षीरसागर : सांगोला तालुक्यातून 59 गावांचा समावेश
सांगोला : जलशिवार अभियानांतर्गत सांगोला तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने लोकसहभागातून वेगवेगळ्या पद्धतीचे बंधारे व विहिरीतून गाळ काढण्याची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून घ्यावीत. तालुक्यात 59 गावांमधून एकाचवेळी 13 हजार विहिरींच्या पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, गावोगावच्या ग्रामस्थांच्या पुढाकाराने जलशिवार अभियान यशस्वी करावे, असे आवाहन प्रांताधिकारी र्शावण क्षीरसागर यांनी केले आहे.
राज्यामध्ये महत्त्वाकांक्षी जलशिवार अभियान सुरु असून, गावोगावच्या विकासकामांचा आराखडा आखण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यात ‘क’ तीनची कामे लोकसहभागातून करावयाची असल्याने प्रांताधिकारी र्शावण क्षीरसागर यांनी गुरुवारी शासकीय विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक पंचायत समिती बचत भवनात घेतली.
यावेळी तहसीलदार र्शीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता महारुद्र अंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता पुरुषोत्तम अंधारे, सा.बां.विभागाचे उपअभियंता थोंटे, लघु पाटबंधारे उपविभागीय अधिकारी विनायक खरात, नीरा उजवा कालवा उपविभागीय अधिकारी शेंडे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
तालुक्यात जलशिवार अभियानातून गावोगावी विकास कामाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. तयार झालेले आराखडे जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, मंजूर कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून घ्यावयाची आहेत. तालुक्यात ‘क’ वर्गातील कामे लोकसहभागातून करावयाची असल्याने अधिकार्‍यांची जबाबदारी वाढणार आहे. तालुक्यातील 93 साखळी बंधार्‍यातील गाळ काढणे, 193 मातीनाला बंधारे बांधणे, 6 विहीर खोलीकरण, 5 हजार 72 विहीर पुनर्भरणाची कामे लोकसहभागातून करावयाची आहेत. जलशिवार अभियानातून निवडलेली कामे पारदर्शकपणे होण्याच्या अनुषंगाने चार गावांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या बंधार्‍यातील गाळ काढण्याची कामे शुक्रवारपासून सुरु करावीत. त्यादृष्टीने ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकार्‍यांनी गावनिहाय बैठका घेऊन कामाचे नियोजन करावे. लोकसहभागाच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अशा सूचना प्रांताधिकारी र्शावण क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.
जलशिवार अभियान यशस्वी राबविण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपापले कर्तव्य चोख बजावावे. ज्याठिकाणी अडीअडचणी उभ्या राहतील अशावेळी प्रशासन तुमच्या पाठीशी राहील. वेळप्रसंगी कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन जरुर घ्यावे. जलशिवार अभियानाचा लाभ गावागावांना मिळणार असून लोकसहभाग वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असे आवाहन तहसीलदार र्शीकांत पाटील यांनी केले.
निवड झालेली गावे
कोळा, तिप्पेहळ्ळी, पाचेगाव खुर्द, बुद्धेहाळ, गौडवाडी, ह.मंगेवाडी, राजुरी, झापाचीवाडी, काळूबाळूवाडी, पाचेगाव बु॥, जुनोनी, वाटंबरे, चोपडी, नाझरा, सरगरवाडी, चिणके, बलवडी, य.मंगेवाडी, लोणविरे, हणमंतगाव, सोनंद, जवळा, भोपसेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, घेरडी, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे,पारे, हंगिरगे, डिकसळ, नराळे, कडलास, अकोला, कमलापूर, एखतपूर, चिंचोली, धायटी, सावे, शिवणे, वाकी शिवणे, बागलवाडी, सोनलवाडी, अचकदाणी, लोटेवाडी, खवासपूर, कटफळ या गावांची जलशिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे.
कोट ::::::::::::::::
जलशिवार अभियानातून ‘क’ एकची सुमारे 14 कोटी 85 लाख रुपये खचरून 188 कामे सुरु आहेत. तर ‘क’ दोनमध्ये पावसाळ्यात शिवारात पडलेले पाणी शिवारात अडविण्यासाठी 2 हजार 53 कामांचा 45 कोटींचा आराखडा जिल्हा समितीकडे सादर केला आहे. ‘क’ तीनमध्ये तालुक्यात जलस्रोताच्या माध्यमातून झालेल्या 5 हजार 795 कामांच्या दुरुस्ती देखभालीसाठी 29 कोटी रुपयांची कामे लोकसहभागातून पूर्ण करावयाची आहेत.
- र्शीकांत पाटील
तहसीलदार, सांगोला