शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

मंदीचा रेल्वेलाही जबरदस्त फटका; माहिती अधिकारामुळे नुकसानीचा आकडा उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 9:19 AM

मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती.

नवी दिल्ली : देशभरात आलेल्या मंदीच्या लाटेमुळे वाहन उद्योगांपासून अनेक उद्योगांनी गेल्या दोन महिन्यांत अनेकदा कंपन्या बंद ठेवल्या आहेत. तर अनेक कामगारांना कामावरून कमी केले आहे. या उत्पादन घटविल्याचा फटका रेल्वेलाही सोसावा लागला आहे. यंदाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीमध्ये रेल्वेला प्रवासी भाड्यातून 155 कोटी रुपये आणि मालवाहतुकीतून तब्बल 3901 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. माहिती अधिकारात हा तोटा समोर आला असून याचे मुख्य कारण देशात मंदी असल्याने मालवाहतूक घटल्याचे समजते. 

मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती. यानुसार रेल्वेला पहिल्या तिमाहीमध्ये प्रवासी भाड्याचून 13,398.92 कोटींची कमाई झाली होती. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये 13,243.81 कोटींची कमाई झाली. तर पहिल्या तिमाहीमध्ये मालभाडे 29,066.92 कोटींचे होते. हे भाडे घटून 25,165.13 कोटी रुपयांचे झाले आहे. 

तिकिट विक्रीमध्येही घटगेल्या वर्षीच्या तिकिट विक्रीशी तुलना करता यंदा यामध्ये 1.27 टक्क्यांची घट झाली आहे. तर उपनगरीय तिकिटांच्या विक्रीमध्ये 1.13 टक्क्यांची घट झाली आहे. 

रेल्वे खात्याने मंदीमुळे झालेल्या नुकसानीवर मात करण्यासाठी काही पाऊले उचलली आहेत. नुकताच त्यांनी सिझनचा अधिभार बंद केला आहे. तर एसी आणि एक्झीक्युटिव्ह श्रेणीच्या तिकिटांवर 25 टक्क्यांची सूट दिली आहे. तसेच इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी 30 वर्षे जुनी इंजिने बंद करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यातच रेल्वेने 17 झोनच्या मुख्यालयांना पत्र लिहून मंदीला रोखण्याची सूचना केली आहे. तसेच कोळशाच्या खाणींच्या क्षेत्रात पूर आल्याने कोळसा वाहतूकही कमी झाली आहे. मंदीने इस्पात आणि सिमेंट उद्योगाचेही कंबरडे मोडले आहे. यामुळे या मालाचीही वाहतूक मंदावली आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMONEYपैसा