शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

२०१४ नंतर बँकांची ५ ट्रिलियन रुपयांची फसवणूक; केंद्र सरकार सपशेल अपयशी; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 6:58 PM

फसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका. रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

ठळक मुद्देफसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका.रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) २०२०-२१ च्या वार्षिक अहवालाच्या आधारावरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच २०१४ नंतब बँकांची ५ ट्रिलिअन रूपयांची फसवणूक झाली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. बँकांची होणारी फसवणूक रोखण्यापासून सरकारला का अपयश आलं आणि ही रक्कम वसूल करण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलत आहेत असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत गौरव वल्लभ यांनी आपल्याला आवश्यक काय आहे हे अशी विचारणा केली. "आपल्याला काय आवश्यक आहे? अर्थव्यवस्था वाचवणं, लोकांचे जीव वाचवणं की मोदी महाल उभारणं. हे आर्थिक आणि नैतिकतेच्या दृष्टीनं योग्य ठरू शकत नाही. तुम्ही केवळ तुमची जिद्द पूर्ण करत आहात," असं गौरव वल्लभ म्हणाले. "नुकताच २०२१-२१ साठी रिझर्व्ह बँकेनं आपला अहवाल सादर केला. यात अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. यात बँकांची फसवणूक झाल्याची आकडेवारीही आहे. यामध्ये २०१४-१५ नंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ २०२१-२१ मध्ये १.३८ लाख कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. २०१४-१५ च्या तुलनेत फसवणूकीची रक्कम २०१४-१५ आणि २०१९-२० दरम्यान ५७ टक्क्यांच्या दरानं वाढली," असं त्यांनी नमूद केलं. सरकार अपयशी का ठरलं?"गेल्या सात वर्षांमध्ये मोदी सरकार बँकांची होणारी फसवणूक रोखण्यात का अपयशी ठरलं. ही रक्कम परत आणण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली? बँकिंग व्यवस्थेला कमकुवत करणाऱ्यांकडून आतापर्यंत किती पैसे वसूल करण्यात आले?," असे सवाल गौरव वल्लभ यांनी केले. जर या रकमेची वसुली झाली तर गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजा रूपयांची मदत देता येऊ शळकते. देशात ५०० एम्स रुग्णालयं सुरू केली जाऊ शकतात आणि सामान्य लोकांनाही करात मदत मिळू शकते असं ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँकfraudधोकेबाजी