शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

...तर रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 15:41 IST

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला पत्र लिहून जुन्या मूर्तीबद्दल प्रश्न विचारला आहे.

Ram Mandir Inauguration: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जवळ येत आहे. पण, देशातील चार शंकराचार्यांनी या सोहळ्याला विरोध दर्सवला आहे. यातच आता ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यापूर्वी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी श्रीरामाच्या जुन्या मूर्तीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

जुन्या मूर्तीचे काय होणा?

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास महाराज यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, काल बातम्यांमधून माहिती मिळाली की, रामललाची मूर्ती एका ट्रकमध्ये भरुन अर्धवट तयार झालेल्या मंदिरात आणली आहे. या मूर्तीची नव्याने बांधलेल्या श्री राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाईल. पण, श्रीरामलला विराजमान(जुनी मूर्ती) आधीपासून मंदिरात आहे. आता प्रश्न पडतो की, नवीन मूर्ती बसवली तर जुन्या मूर्तीचे काय होणार? 

ते पुढे म्हणतात की, हे नवे मंदिर श्री रामलला विराजमानासाठी बांधले जात आहे, असा समज राम भक्तांमध्ये होता. पण आता या मंदिराच्या गाभार्‍यात नवीन मूर्ती आणली गेली आहे. लक्षात ठेवा, हे तेच रामलला विराजमान आहेत, जे श्रीराम जन्मभूमितून प्रकट झाले आहेत. मुस्लिम चौकीदारानेही याची साक्ष दिली आहे. ज्यांनी अनेक प्रसंगांना धैर्याने सामोरे गेले, ज्यांनी वर्षानुवर्षे तंबूत राहून ऊन, पाऊस, थंडी सहन केली, ज्यांनी कोर्टात केस लढवली आणि जिंकली. यासाठी भितीनरेश राजा महताब सिंह, राणी जयराजराजकुंवर, पुजारी पंडित देविदिन पांडे, हंसवरचे राजा रणविजय सिंह, असंख्य संतांनी आणि रामभक्तांनी बलिदान दिले आहे. 

ज्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती सापडते, ती इतर ठिकाणी स्थापित केली जाऊ शकत नाही. हे प्रकरण कोर्टात असतानाही वकिलांनी हाच मुद्दा मांडला होता. आता आमची विनंती आहे की, मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान, म्हणजेच जुनी मूर्ती स्थापित करावी. अन्यथा हे कार्य इतिहास, लोकभावना, धर्मशास्त्र आणि नैतिकतेच्या विरोधात असेल. असे न केल्यास रामलला विराजमानवर खुप मोठा अन्याय होईल. आम्ही आशा करतो की, आमचे म्हणने तुमच्यापर्यंत पोहचले असेल आणि तुम्ही यावर विचार कराल, असं अविमुक्तेश्वरानंद यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTempleमंदिरBJPभाजपा