शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:09 IST

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांची राखी बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. पण अचानक असं काही घडलं की किवाड गावातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांची राखी बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. पण अचानक असं काही घडलं की किवाड गावातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हरियाणाहून आपल्या गावी परतत असेलल्या ३५ वर्षीय नीतूचा मुसळधार पावसात रस्त्यावर स्कूटी घसरल्याने मृत्यू झाला.

किवाड गावातील रहिवासी नीतू हरियाणामध्ये काम करत होता. रक्षाबंधनाच्या दिवशी तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावात पोहोचत होता. जयरामपूर आणि किवाड गावातील रस्ता गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या पाण्यात बुडाला होता. गावकऱ्यांनी त्याला पुढे जाण्यास मनाई केली, परंतु घरी पोहोचण्याच्या घाईत त्याने इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. 

नीतू स्कूटी घेऊन त्याच रस्त्यावरून जाताच तो पाण्यात पडला आणि वाहून गेला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी लगेच शोध सुरू केला, परंतु सुमारे दोन तासांनंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा भरला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याची मोठी बहीण रक्षाबंधन साजरं करण्यासाठी तिच्या माहेरी आली होती, तर एक धाकटी बहीणही गावात होती. 

दोन्ही बहिणींच्या राखी बांधण्यासाठी आपल्या भावाची वाट पाहत होत्या. सततच्या पावसामुळे गावात आणि परिसरात पाणी साचलं. गंभीर परिस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते बंद असल्याने लोकांना ये-जा करणं कठीण झालं. वेळेवर पाण्याचा निचरा न झाल्यामुळे असे अपघात होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. नीतूचा मृत्यू प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनDeathमृत्यूAccidentअपघात