शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

राज्यसभा अधिवेशनाचे सूप वाजले, २५ विधेयके केली मंजूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 03:33 IST

इतिहासात पहिल्यांदाच घडल्या काही गोष्टी -व्यंकय्या नायडू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभेचे सत्र ठरलेल्या अवधीच्या आठ दिवस आधीच गुंडाळण्यात आले. या कमी अवधीच्या सत्रात तब्बल २५ विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.

या सत्रामध्ये कृषी विधेयकांवरून विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेयक शेतकरीविरोधी आणि काही ठराविक व्यापाऱ्यांच्या हिताचे असल्याचे आरोप करण्यात आले होते. गोंधळ घालून उपसभापतींचा माईक तोडण्याचा प्रयत्न करण्याच्या कारणावरून सभापती नायडू यांनी ८ सदस्यांना सत्र संपेपर्यंत निलंबित केले. त्यात विरोधी पक्षातील सदस्यांचा समावेश होता.कामकाजावरील बहिष्कार खेदजनकविरोधी सदस्यांनी दोन दिवसांपासून कामकाजावर बहिष्कार टाकला. याबाबत नायडू यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, अधिवेशन घेणे हे कायद्यानुसार बंधनकारक होते. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रातील लोक काम करीत असताना खासदारांवर जी जबाबदारी आहे ती पूर्ण पाडायला पाहिजे, असेही चर्चेत सांगितले होते. उपसभापतींना पदावरून हटवा, अशी मागणीही राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदा झाली आहे. मी ही सूचना तात्काळ फेटाळली, कारण ही बाब नियमांना अनुरूप नव्हती.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा