शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:27 IST

देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली  - देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.भाजपचे अशोक वाजपेयी म्हणाले की, नीती आयोगाने त्याच्या अहवालात पुढील वर्षी देशाच्या काही भागांत पाणीटंचाई असेल, असे म्हटले आहे. भाजपचे सरोज पांडे यांनी जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्यावर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू म्हणाले, लक्षवेधी सूचना दिली गेल्यास या विषयावर मी चर्चेला परवानगी देईन.सदस्यांनी आपापसांत चर्चा करून अशी नोटीस देण्याचा सल्लाही नायडू यांनी दिला. काँग्रेसचे टी. सुब्बरामी रेड्डी यांनी वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करून येत्या काही वर्षांत भारत लोकसंख्येत चीनलाही मागे टाकेल, असे म्हटले. कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन आणि काही सवलती काढून घेण्याची उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. वाढत्या लोकसंख्येने पर्यावरण, आर्थिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला असून, बेरोजगारी वाढत चालली आहे. प्रोत्साहन आणि सवलती काढून घेतल्याशिवाय लोकसंख्या नियंत्रण होणार नसल्याचे रेड्डी म्हणाले.नद्या जोडण्याची मागणीशून्य कालावधीत हा मुद्दा भाजपचे सत्यनारायण जतिया यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकच्या काही भागांनी परंपरागतरीत्या पाणीटंचाईला तोंड दिले आहे; पण ही टंचाई आता नव्या भागांतही पोहोचली आहे.पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, असे सांगून जतिया यांनी पाच मोठ्या नद्या एकमेकींशी जोडण्याचा प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्याची गरज व्यक्त केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळIndiaभारत