शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:27 IST

देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली  - देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.भाजपचे अशोक वाजपेयी म्हणाले की, नीती आयोगाने त्याच्या अहवालात पुढील वर्षी देशाच्या काही भागांत पाणीटंचाई असेल, असे म्हटले आहे. भाजपचे सरोज पांडे यांनी जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्यावर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू म्हणाले, लक्षवेधी सूचना दिली गेल्यास या विषयावर मी चर्चेला परवानगी देईन.सदस्यांनी आपापसांत चर्चा करून अशी नोटीस देण्याचा सल्लाही नायडू यांनी दिला. काँग्रेसचे टी. सुब्बरामी रेड्डी यांनी वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करून येत्या काही वर्षांत भारत लोकसंख्येत चीनलाही मागे टाकेल, असे म्हटले. कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन आणि काही सवलती काढून घेण्याची उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. वाढत्या लोकसंख्येने पर्यावरण, आर्थिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला असून, बेरोजगारी वाढत चालली आहे. प्रोत्साहन आणि सवलती काढून घेतल्याशिवाय लोकसंख्या नियंत्रण होणार नसल्याचे रेड्डी म्हणाले.नद्या जोडण्याची मागणीशून्य कालावधीत हा मुद्दा भाजपचे सत्यनारायण जतिया यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकच्या काही भागांनी परंपरागतरीत्या पाणीटंचाईला तोंड दिले आहे; पण ही टंचाई आता नव्या भागांतही पोहोचली आहे.पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, असे सांगून जतिया यांनी पाच मोठ्या नद्या एकमेकींशी जोडण्याचा प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्याची गरज व्यक्त केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळIndiaभारत