शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आकडे फिरणार! मोदी सरकारची पॉवर वाढणार; काँग्रेसवर मोठी नामुष्की? भाजपला बंपर लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 13:35 IST

काँग्रेसची पिछेहाट अन् भाजप सुस्साट; आकड्यांच्या खेळात सत्ताधाऱ्यांकडे मोठी आघाडी

नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची धूळधाण उडाली. पाचपैकी केवळ एका राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मात्र तिथली सत्तादेखील काँग्रेसला गमवावी लागली. याचा फटका काँग्रेसला राज्यसभेत बसला आहे. लोकसभेत काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के जागा जिंकाव्या लागतात. तितकं संख्याबळ काँग्रेसकडे नाही. आता राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडून जाऊ शकतं. 

२०२२ मध्ये राज्यसभेच्या जवळपास ७५ जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेत सध्या काँग्रेसचे ३४ सदस्य आहेत. यंदा होत असलेल्या निवडणुकानंतर काँग्रेसची सदस्यसंख्या २५ च्या खाली येऊ शकते. तसं झाल्यास पक्षाकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद जाईल. राज्यसभेतील एकूण सदस्यसंख्या २५० आहे. यातील २३८ सदस्य निवडून येतात. तर १२ सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात. 

राज्यांमधील आमदार राज्यसभेचे खासदार निवडतात. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांमधील निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. याचा परिणाम राज्यसभेच्या निवडणुकीवर होणार आहे. ३१ मार्चला राज्यसभेच्या १३ जागांसाठी निवडणूक होईल. यातील ५ जागा पंजाबच्या आहेत. तर इतर ८ जागांमध्ये आसामच्या २, केरळच्या ३, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. 

वर्षाअखेरीस उत्तर प्रदेशातील ११, बिहारच्या ५, राजस्थानच्या ४, मध्य प्रदेशच्या ३ आणि उत्तराखंडच्या एका राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. याशिवाय ओदिशा, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील जागांवरही निवडणुका आहेत. पंजाबमधील मोठ्या पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे १८ आमदार आहेत. तर आपचे ९२ उमेदवार निवडून आले. त्यामुळे पंजाबमधील राज्यसभेच्या पाचही जागा आपकडे जातील. त्यामुळे आपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या ३ वरून ८ वर जाईल. 

केरळमधील एक जागा काँग्रेसला मिळेल. आसाममधील एक जागाही काँग्रेसला मिळू शकेल. राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या लवकरच १०० च्या पुढे जाईल. याशिवाय भाजपप्रणित एनडीए बहुमताचा आकडा गाठेल. सध्या राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या ९७ आहे. निवडणुकांनंतर ती १०४ होईल. तर एनडीएचं संख्याबळ १२२ पर्यंत जाईल. त्यामुळे २४३ सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत एनडीएकडे बहुमत असेल. 

विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसताना दिसत आहे. सध्या राज्यसभेत काँग्रेसचे ३४ सदस्य आहेत. वर्षाअखेरीस हा आकडा २७ पर्यंत येईल. राज्यसभेच्या काँग्रेसच्या सदस्यांनी पक्ष सोडल्यास हा आकडा २५ च्या खाली येऊ शकतो. तसं झाल्यास विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या हातून जाईल.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा