शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

राज्यसभा १0 वेळा तहकूब, भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयक झालेच नाही मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:39 AM

आक्रमक विरोधकांमुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी तब्बल १0 वेळा तहकूब झाले. मोदी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयकावर अखेरपर्यंत चर्चा होऊ शकली नाही. चर्चेविनाच विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्नही फसला.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - आक्रमक विरोधकांमुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी तब्बल १0 वेळा तहकूब झाले. मोदी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयकावर अखेरपर्यंत चर्चा होऊ शकली नाही. चर्चेविनाच विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्नही फसला. अखेर सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी उपसभापती पी.जे. कुरियन यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरू होताच केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांना भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयक मांडण्यास सभापतींनी अनुमती दिली. हे विधेयक सादर करताच, सभागृहात गोंधळ सुरू झाला. बहुतांश विरोधक घोषणा देत सभापतींसमोरील आसनासमोर उतरले. त्यामुळे आधी ३0 मिनिटांसाठी तर नंतर दुपारी २.४३ वाजता तसेच ३.१३, ३.३९, ३.५४,४.१0,४.३0, ४.४५, व ४.५५ वाजता गदारोळामुळे कामकाज तहकूब होत गेले.उपसभापतींनी गोंधळ करणाऱ्यांना जाण्याचे आदेश देताना हे विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या सुखेन्दु शेखर यांनी मतविभाजनाची मागणी केली. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले की, राज्यसभेत अनेक नवे सदस्य आले आहेत. त्यांची नावे इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर नसल्याने मतदानात त्यांना तांत्रिक अडचणी आहेत. त्यापेक्षा कामकाज तहकूब करणे उचित ठरेल.त्यावर संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार म्हणाले की, शर्मा सभागृहाची दिशाभूल करीत आहेत, विधेयक मंजूर करता येऊ शकते. राज्यमंत्री विजय गोयल म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधात कठोर तरतुदींचे हे विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे. गेले १९ दिवस सभागृहात कामकाज झालेले नाही. अशा प्रकारे सभागृहाला वेठीला धरणे सर्वथा अनुचित आहे. विरोधी सदस्यांनी विधेयक मंजुरीला सहकार्य करावे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनीही नवे सदस्य जरूर मतदान करू शकतात, जुन्या सदस्यांप्रमाणे त्यांनाही मतदानाचा अधिकार आहेच असा दावा केला. उपसभापती कुरियन म्हणाले, तांत्रिक अडचण असल्यास नव्या सदस्यांचे कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान घेता येईल. मात्र विरोधक ऐकायला तयार नसल्याने आणखी तीनदा कामकाज तहकूब झाले.सायंकाळी ५.११ वाजता उपसभापती कुरियन यांनी अत्यंत विनवणीच्या स्वरात सदस्यांना विधेयकाच्या मंजुरीबाबत मत विचारले. निवडून आलेल्या सरकारला संसदेत विधेयक मंजूर करण्याचा अधिकार नाही काय? असा प्रश्नही त्यांनी केला. तृणमूलचे सुखेन्दु शेखर म्हणाले की मतविभाजन शक्य नसेल तर कामकाज तहकूब करण्याशिवाय पर्यायच नाही. या सर्व काळात उपसभापतींच्या आसनासमोर विरोधी सदस्यांची घोषणाबाजी व गोंधळ चालूच होता. अखेर सायंकाळी ५.१४ वाजता राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.उपसभापतीपदाची आॅफर नाही : राऊ तशिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचे उपसभापतीपद देण्यास भाजपा नेते तयार आहेत, या वृत्ताचा संजय राऊ त यांनी ठामपणे इन्कार केला आहे. अशी कोणतीही आॅफर भाजपाकडून आलेली नाही, आली तरी शिवसेना ती स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत शिवसेनेचे संजय राऊ त, राजकुमार धूत व अनिल देसाई हे तीन सदस्य आहेत. तिघांमधे संजयराऊ त सर्वात अनुभवी आहेत. हा प्रस्ताव स्वीकारल्यास या मानाच्या पदावर त्यांची अथवा अनिल देसार्इंची वर्णी लागू शकते.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदIndiaभारतPoliticsराजकारण