शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

राजू शेट्टी जम्मू-काश्मीरला जाणार, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 6:23 PM

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी जम्मूकाश्मीरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जाणार आहेत. 

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी जम्मूकाश्मीरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जाणार आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशातील विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी राजू शेट्टी दिल्लीत आले होते. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, तेथील शेतकऱ्यांची स्थिती अंत्यत गंभीर आहे. राज्यघटनेतील ३७० चे कलम रद्द केल्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद तुटला आहे. देशाला सफरचंद पुरविणाऱ्यां या प्रदेशातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांकडे २० लाख सफरचंद साठलेला आहे. हे सफरचंद घ्यायला कुणीही तयार नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण येत्या काही दिवसात जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. तेथील शेतकऱ्यांशी संवाद केल्यानंतर राज्य व केंद्र सरकारला त्याची माहिती देऊ. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल पत्र लिहिले आहे. परंतु कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांचे सर्व अर्थव्यवस्था एकाच पिकावर अवलंबून आहे. सफरचंदचे पीक घ्यायला कुणी व्यापारी तयार नसेल तर त्यांना मोबदला मिळणार नाही. सरकारने बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करावी नाहीतर राज्य वा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली.शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीमहाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष द्यायला राज्य व केंद्रातील नेत्यांना वेळ कुठे आहे? यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये महापुराने मोठे नुकसान झाले. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी वा केंद्रातील नेते आले नव्हते. केंद्र व राज्य दोन्ही सरकारला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नाही. काँग्रेसच्या सरकारला किमान शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती होती. शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवायला सुद्धा हे सरकार तयार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagricultureशेतीPoliticsराजकारणJammu Kashmirजम्मू-काश्मीर