शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

“अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक, गरज पडली तर...”; राजनाथ सिंहानी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 15:04 IST

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे.

ठळक मुद्देअफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मकभारताचे सर्व गोष्टींवर बारकाइने लक्षराजनाथ सिंह यांचे पाकिस्तानवरही जोरदार टीकास्त्र

वेलिंगटन:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सरकार स्थापण्याची हालचाल सुरू असतानाच काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी थेट बदला घेण्याची भूमिका घेतल्याने आता पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच एकूण परिस्थितीबाबत भारताने सावध पवित्रा घेतला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे. (rajnath singh says situation in afghanistan is challenging we will change our strategy)

अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती खूपच आव्हानात्मक झाली आहे. या परिस्थितीने अनेक देशांना आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यास भाग पाडले आहे. भारत सर्व गोष्टींवर बारकाइने लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास आपल्यालाही रणनीतीमध्ये बदल करावा लागेल, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूमधील वेलिंगटन येथे ते बोलत होते. तसेच संरक्षण मंत्रालयाकडून इंटीग्रेटेड बॅटल ग्रुप तयार करण्यावर विचार केला जात आहे. आगामी काळात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर तेव्हा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या ग्रुपची मोठी मदत होईल, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले. 

“१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?”

पाकिस्तान गप्प आहे, कारण भारत बदललाय

राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. दोन युद्धात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांना हाताशी धरून भारताला त्रास देण्यास सुरुवात केली. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम करतोय. आताच्या घडीला सीमेवर शांतता आहे. पाकिस्तान गप्प आहे, याचे कारण भारत बदललाय हे त्यांना माहिती आहे. दहशतवाद्यांना तसेच पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. 

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लडाख येथेही परिस्थिती आव्हानात्मक झाली होती. तेव्हा रात्री ११ वाजता लष्कर प्रमुख यांच्याशी महत्त्वाची चर्चा करण्यात आली. यानंतर आपले जवान देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी किती कटिबद्ध आहे सर्वांनीच पाहिले, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.  

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकारTamilnaduतामिळनाडू