शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

“अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक, गरज पडली तर...”; राजनाथ सिंहानी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 15:04 IST

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे.

ठळक मुद्देअफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मकभारताचे सर्व गोष्टींवर बारकाइने लक्षराजनाथ सिंह यांचे पाकिस्तानवरही जोरदार टीकास्त्र

वेलिंगटन:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सरकार स्थापण्याची हालचाल सुरू असतानाच काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी थेट बदला घेण्याची भूमिका घेतल्याने आता पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच एकूण परिस्थितीबाबत भारताने सावध पवित्रा घेतला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे. (rajnath singh says situation in afghanistan is challenging we will change our strategy)

अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती खूपच आव्हानात्मक झाली आहे. या परिस्थितीने अनेक देशांना आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यास भाग पाडले आहे. भारत सर्व गोष्टींवर बारकाइने लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास आपल्यालाही रणनीतीमध्ये बदल करावा लागेल, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूमधील वेलिंगटन येथे ते बोलत होते. तसेच संरक्षण मंत्रालयाकडून इंटीग्रेटेड बॅटल ग्रुप तयार करण्यावर विचार केला जात आहे. आगामी काळात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर तेव्हा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या ग्रुपची मोठी मदत होईल, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले. 

“१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?”

पाकिस्तान गप्प आहे, कारण भारत बदललाय

राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. दोन युद्धात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांना हाताशी धरून भारताला त्रास देण्यास सुरुवात केली. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम करतोय. आताच्या घडीला सीमेवर शांतता आहे. पाकिस्तान गप्प आहे, याचे कारण भारत बदललाय हे त्यांना माहिती आहे. दहशतवाद्यांना तसेच पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. 

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लडाख येथेही परिस्थिती आव्हानात्मक झाली होती. तेव्हा रात्री ११ वाजता लष्कर प्रमुख यांच्याशी महत्त्वाची चर्चा करण्यात आली. यानंतर आपले जवान देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी किती कटिबद्ध आहे सर्वांनीच पाहिले, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.  

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकारTamilnaduतामिळनाडू