शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

“अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक, गरज पडली तर...”; राजनाथ सिंहानी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 15:04 IST

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे.

ठळक मुद्देअफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मकभारताचे सर्व गोष्टींवर बारकाइने लक्षराजनाथ सिंह यांचे पाकिस्तानवरही जोरदार टीकास्त्र

वेलिंगटन:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सरकार स्थापण्याची हालचाल सुरू असतानाच काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी थेट बदला घेण्याची भूमिका घेतल्याने आता पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच एकूण परिस्थितीबाबत भारताने सावध पवित्रा घेतला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे. (rajnath singh says situation in afghanistan is challenging we will change our strategy)

अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती खूपच आव्हानात्मक झाली आहे. या परिस्थितीने अनेक देशांना आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यास भाग पाडले आहे. भारत सर्व गोष्टींवर बारकाइने लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास आपल्यालाही रणनीतीमध्ये बदल करावा लागेल, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूमधील वेलिंगटन येथे ते बोलत होते. तसेच संरक्षण मंत्रालयाकडून इंटीग्रेटेड बॅटल ग्रुप तयार करण्यावर विचार केला जात आहे. आगामी काळात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर तेव्हा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या ग्रुपची मोठी मदत होईल, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले. 

“१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?”

पाकिस्तान गप्प आहे, कारण भारत बदललाय

राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. दोन युद्धात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांना हाताशी धरून भारताला त्रास देण्यास सुरुवात केली. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम करतोय. आताच्या घडीला सीमेवर शांतता आहे. पाकिस्तान गप्प आहे, याचे कारण भारत बदललाय हे त्यांना माहिती आहे. दहशतवाद्यांना तसेच पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. 

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लडाख येथेही परिस्थिती आव्हानात्मक झाली होती. तेव्हा रात्री ११ वाजता लष्कर प्रमुख यांच्याशी महत्त्वाची चर्चा करण्यात आली. यानंतर आपले जवान देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी किती कटिबद्ध आहे सर्वांनीच पाहिले, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.  

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकारTamilnaduतामिळनाडू