शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू' म्हणाले होते अन्..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 21:25 IST

राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू'ही म्हणाले होते. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचा याहून मोठा आपमान काय असू शकतो? असा सवाल करत आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर प्रहार केला.

जेव्हा राजीव गांधी विरोधीपक्षनेते होते, तेव्हाचे संसदेतील त्यांचे भाषण आहे, त्यांनी आरक्षणाला कडाडून विरोध केला होता. ते एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू'ही म्हणाले होते. हे राजीवजी आहेत. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचा याहून मोठा आपमान काय असू शकतो? असा सवाल करत आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. ते हरियाणामधील कुरुक्षेत्रात आयोजित भाजपच्या एका प्रचारसभेत जनतेला संबोधित करत होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातीलकाँग्रेसच्या भावनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी म्हणाले, "भारतात सर्वात मोठा दलित विरोधी, ओबीसी विरोधी, आदिवासी विरोधी, जर कुणी असेल तर, तो काँग्रेसचा परिवार आहे. आता या लोकांनी म्हटले आहे की, सरकारमध्ये आल्यास, दलित आणि मागास समाजाचे आरक्षण रद्द करणार. हेच या परिवाराचे सत्य आहे. काँग्रेसचा परिवार नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत होता. आरक्षणाला घोर विरोध करत आला आहे. या परिवाराने नेहमीच दलीत, ओबीसी आणि आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. आपण लक्षात असू द्या, नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी आरक्षणाला विरोध केला होता. राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नाही, तर नेहरू असेही म्हणाले होते की, आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर, सरकारी सेवांची क्वालिटी खराब होईल. हे नेहरूंचे शब्द आहेत." 

ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा इतिहास सांगताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेतले. ते म्हणाले, "ओबीसी आरक्षणासाठी ज्या काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना झाली होती, त्याचा जो अहवाल आला होता, तो ओबीसी समाजाचे भाग्य बदलणारा होता. पण पंडित नेहरूंनी तो थंड बासनात टाकला. नेहरूंनंतर इंदिरा गांधी आल्या, त्यांनीही ओबीसी आरक्षण रोखून ठेवले. जेव्हा देशाने त्यांना शिक्षा केली, जनता पक्षाचे सरकार आले, मोरांजी भाईंच्या नेतृत्वात मंडल आयोगाची स्थापना झाली. मत्र नंतर पुन्हा काँग्रेस आली, त्यांनी मंडल आयोगाचा अहवालही थंड बासनात टाकला होता." 

...तेव्हा कुठे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले-पुढे बोलताना मोदी म्हणाले, "राजीव गांधींनीही आपल्या सरकारच्या काळात ओबीसींना आरक्षण मिळू दिले नाही. जेव्हा केंद्रात भाजपच्या समर्थनाने व्हीपीसिंहांचे सरकार बनले, तेव्हा मंडल आयोगाचा अहवाल लागू झाला. (व्हीपीसिंहांचे सरकार आले होते, अटलजींच्या जनसंघाने/भाजपने समर्थन केले होते.) तेव्हा कुठे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले. जेव्हा भाजपचे समर्थन होते." असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. 

आजची काँग्रेस अर्बन नक्षलवादाचं नवं रूप -मोदी म्हणाले, "गांधीजी नेहमीच सत्याची बाजू घेत होते. स्वातंत्र्यानंतर काही वर्षे काँग्रेसवर महात्मा गांधींच्या संस्काराचा परिणाम होता. मात्र, आज ही ती जुणी काँग्रेस नाही. आजची काँग्रेस म्हणजे, अर्बन नक्षलवादाचे नवे रूप बनली आहे. आता काँग्रेसला खोटे बोलण्यात कसल्याही प्रकारची लाज वाटत नाही. काँग्रेसचे खोटे पकडले गेले तरी तिला लाज वाटत नाही. काँग्रेस रोजच्या रोज एक नवं खोटं बोलते. काँग्रेस देशाच्या एकात्मतेवर सातत्याने वार करत आहे. काँग्रेसकडून देशावर नक्षलवादी विचार थोपले जात आहेत." एवढेच नाही तर, "भाजपला बदनाम करण्यासाठी, भारताची बदनामी करण्यात त्यांना (काँग्रेस) जराही लाज वाटत नाही. यामुळे आपल्याला काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांपासून सावधान रहायचे आहे," असेही मोदी यावेली म्हणाले.

पुन्हा एकदा भाजप सरकार बनवण्याचे आवाहन -यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारच्या कामांचा पाढा वाचत हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला. हरियाणामध्ये भाजपची हैटट्रिक निश्चित असल्याचेही ते म्हणाले. तसेच, "विकसित भारतासाठी हरियाणा विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. हरियाणाच्या पावण भूमिवरून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा भाजप सरकार बनवण्यासाठी निवेदन करतो," असेही मोदी म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाOBC Reservationओबीसी आरक्षणSC STअनुसूचित जाती जमातीreservationआरक्षण