शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

Rajiv Gandhi Assassination: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काँग्रेस नाराज...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 5:52 PM

Rajiv Gandhi Assassination: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

Rajiv Gandhi Assassination Case: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. या आरोपींवर अन्य कुठलाही खटला नसेल, तर त्यांना मुक्त करण्यात यावे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे. कोर्टाच्या निर्णयावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा आरोपींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (11 नोव्हेंबर) दिले. 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य, पूर्णपणे चुकीचा' असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश (Jairam Ramesh) म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या भावनेनुसार काम केले नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.'

"सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अस्वीकार्य"माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अस्वीकार्य असल्याचे जयराम रमेश म्हणाले. या निर्णयाची आम्ही पूर्णपणे निंदा करतो, असे रमेश म्हणाले. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने दोषींचे चांगले वर्तन लक्षात घेऊन हा आदेश दिला आहे.

या दोषींची सुटका करण्यात आलीसर्वोच्च न्यायालयाने नलिनी, रविचंद्रन, रॉबर्ट पायस, जयकुमार, एस राजा आणि श्रीहरन यांची सुटका केली. यापूर्वी, कलम 142 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून, सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगलेल्या पेरारीवलन याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. पेरारिवलन खून प्रकरणातील सात दोषींपैकी एक होता.

1991 मध्ये माजी पंतप्रधानांची हत्या 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेराम्बदूर येथे एका प्रचारसभेदरम्यान आत्मघाती हल्ला करून राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. यासाठी धनू नावाच्या महिला आत्मघाती हल्लेखोराचा वापर करण्यात आला. या प्रकरणी पेरारिवलन याच्यासह 7 जणांना दोषी ठरवण्यात आले होते.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय