शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राजस्थानमध्ये नाराजांमुळे काँग्रेसच्या अडचणीत भर; आयारामांना संधी दिल्याने बंडखोरांचे राजीनामासत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 5:33 AM

राजस्थानात काँग्रेसची स्थिती चांगली असून, वातावरण सरकारविरोधी आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे विविध सर्वेक्षणांतून दिसत आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक नेत्यालाच काँग्रेसची उमेदवारी हवी आहे.

- सुहास शेलार

जयपूर : राजस्थानात काँग्रेसची स्थिती चांगली असून, वातावरण सरकारविरोधी आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे विविध सर्वेक्षणांतून दिसत आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक नेत्यालाच काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. ती न मिळाल्याने अनेक नेते व कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांची समजूत घालण्यात नेत्यांचा वेळ जात आहे. जयपूर, कोटा, बिकानेर व भरतपूरमध्ये नाराज नेत्यांनी शक्तीप्रदर्शन केले तर काहींनी राजीनामासत्र सुरू केले आहे. त्यामुळे विजयश्री खेचून आणण्याच्या प्रयत्नांत असलेल्या नेत्यांना नाराजांची मनधरणी करावी लागत आहे.काँग्रसने पहिल्या यादीत ४६ नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, एकूण २३ जाट, १३ राजपूत, २९ एससी आणि २४ एसटी उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट टोंकमधून, तर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरामधून निवडणूक लढत आहेत. मात्र, आयात नेत्यांना उमेदवारी न देण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणेला बगल देत राजस्थानात सहा आयारामांना संधी दिली आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले हबीब उर रहमान यांना नागौर, खा. हरीश मीणा यांना देवळी-उनियारा, कन्हैयालाल झंवर यांना बीकानेर पूर्व, तर सोनादेवी बावरी यांना रायसिंह नगरमधून उभे केले आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले राजकुमार यांना नवलगड, माजी आयपीएस अधिकारी सवाई सिंह गोदारा यांना खिंवसरमधून तिकिट दिले आहे.जयपूरमधील किसनपोलमधून अमीन कागजी यांना संधी दिल्याने माजी महापौर व काँग्रेसच्या महासचिव ज्योती खंडेलवाल यांनी राजीनामा दिला आहे. विद्याधर नगरमधून दोनदा निवडणूक लढवलेल्या विक्रम सिंह यांना तिकिट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जयपूर पक्ष कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. विक्रम सिंह अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. माजी खासदार ब्रह्मदेव कुमावत यांनीही बंड करीत अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत. जैसलमेरमधून माजी आमदार सुनिता भाटी, डुंगरपूरमधून तिकीट नाकारलेले महेंद्र बरजोड काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या २00 हून अधिक पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत. सर्वेक्षणांत काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी बंडखोरीमुळे पक्षाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.रेल्वे रोखल्या, खुर्च्या जाळल्याराजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी. डी. कल्ला यांना बिकानेरमधून तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेलरोको केला आणि काँग्रेस कार्यालयातील खुर्च्याही जाळल्या. जयपूर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर नाराज कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. बस्सीमधून तिकीट न मिळाल्याने लक्ष्मण मीणा यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दक्षिण कोटाची उमेदवारी न मिळाल्याने राखी गौतम यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. दोनदा काँग्रेसशी बंडखोरी करून परत काँग्रेसमध्ये परतलेल्या पृथ्वीराज मीणायांना उमेदवारी न मिळाल्याने तेही नाराज आहेत.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस