शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या बंडावर राहुल गांधींचं अप्रत्यक्ष भाष्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 19:09 IST

Rajasthan Political Crisis: पायलट यांचा उल्लेख न करता राहुल गांधींचं सध्याच्या घडामोडींवर भाष्य

नवी दिल्ली: काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडामुळे राजस्थानात काँग्रेसच्या अडचणी (Rajasthan Political Crisis) वाढल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा करत पायलट यांनी त्यांना थेट बहुमत सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान दिलं. मात्र आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं पायलट यांनी स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आव्हान देऊन सरकारला धोका पोहोचवल्याप्रकरणी काँग्रेसनं काल सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली. पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्षापदावरून दूर करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींवर राहुल यांनी आज एनएसयूआयच्या बैठकीत अप्रत्यक्ष भाष्य केलं. 'कोणालाही पक्ष सोडायचा असल्यास ते तसं करू शकतात. त्यामुळे तुमच्यासारख्या नेत्यांना संधी मिळते,' असं राहुल गांधींनी एनएसयूआयच्या बैठकीत म्हटल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.बंडखोर आमदारांना नोटीसराजस्थानात सत्ता संघर्ष सुरू असताना काँग्रेसनं बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची तयारी पक्षानं केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. यामध्ये पायलट यांच्यासह १९ आमदारांचा समावेश आहे.गांधी कुटुंबाशी असलेले संबंध बिघडवण्याचे प्रयत्नउपमुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी अद्याप पत्रकार परिषद घेतलेली नाही. आपण आजही काँग्रेसी आहोत आणि भाजपामध्ये जाणार नाही. भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा केवळ माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी केल्या जात असल्याचं पायलट यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं. राजस्थानमधील काही स्वपक्षीय नेते माझे पक्ष नेतृत्त्वासोबतचे संबंध बिघडवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा