शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Rajasthan Political Crisis: भाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 14:07 IST

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे सायलेंट माडवर

जयपूर: राजस्थानात सुरू असलेला राजकीय सत्तासंघर्ष थांबताना दिसत नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामधील संघर्ष टोकाला गेला आहे. सरकार स्थिर असल्याचा दावा गेहलोत यांच्याकडून केला जात आहे. तर गेहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा पायलट यांचा दावा आहे. सत्ता संघर्ष सुरू असताना गेहलोत मात्र अतिशय शांत असल्याचं दिसत आहे. गेहलोत यांना सरकार टिकण्याचा विश्वास आहे. यामागे भाजपाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे असल्याचं म्हटलं जात आहे. सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानं राजस्थानातील सत्ता संघर्ष सुरूच आहे. राजस्थानातील भाजपाचे नेतेदेखील सक्रीय झाले आहेत. आमदारांच्या घोडेबाजारावरून दाखल करण्यात आलेला एफआयआर, मुख्यमंत्री गेहलोत यांचे भाजपावरील आरोप यावर वसुंधरा राजे शांत आहेत. त्यांनी शनिवारी आणि रविवारी अवघी दोन ट्विट केली आहेत. मात्र ती राजकारणाशी संबंधित नाहीत. राजस्थानातल्या सत्तासंघर्षावर भाजपाच्या इतर नेत्यांप्रमाणे वसुंधरा राजे कोणताही हस्तक्षेप करताना दिसत नाहीत. यामागे राजकीय गणित असल्याचं राजकीय पंडित सांगतात. गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यामध्ये अतिशय उत्तम राजकीय केमिस्ट्री आहे. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर राजे यांनी त्याविरोधात कोणतीही टीका केलेली नाही. इतकंच नव्हे, तर गेल्या दीड वर्षांत त्या सरकारविरोधात त्या सरकारविरोधात कधीही रस्त्यावर उतरलेल्या नाहीत.गेहलोत सत्तेत आल्यानंतर त्यांनी वसुंधरा यांच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या मुख्य सचिव डी. बी. गुप्ता यांना पदावरून दूर केलं नाही. याची तक्रार पायलट यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून केली. त्यानंतर गेहलोत यांनी गुप्ता यांना पदावरून हटवलं आणि त्यांची नियुक्ती राजकीय सल्लागारपदी नियुक्ती केली. गुप्ता हे वसुंधरा यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेहलोत अतिशय कसलेले नेते मानले जातात. राजकीय गणित जुळवणं हे त्यांचं कौशल्य मानलं जातं. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाcongressकाँग्रेस