शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शेतकऱ्याच्या पोटात अर्धा लिटर विष; डॉक्टरांनी तब्बल 5000 इंजेक्शन देऊन वाचवला जीव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 13:31 IST

डॉक्टरांनी रुग्णाच्या गळ्याला पाडले छिद्र अन्...राजस्थानच्या पालीमध्ये घडली ही धक्कादायक घटना.

Rajasthan News: एखाद्या व्यक्तीच्या शरीरात काही थेंब विष गेले, तरी त्याच्या जीवावर बेतू शकते. पण, राजस्थानच्या पालीमधून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथील एका शेतकऱ्याच्या पोटात एक दोन नव्हे, तर तब्बल अर्धा लिटरहून अधिक विष गेले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्या शेतकऱ्याचा जीव वाचवला. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी त्याच्या शेतात पिकांवर कीटकनाशक फवारत होता. यावेळी चुकून कीटकनाशक त्याच्या शरीरात गेले. यामुळे तो आजारी पडला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. हे कीटकनाशक इतके विषारी होते की, त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

5000 इंजेक्शन दिलेशेतकऱ्याच्या शरीरात 600 एमएल कीटकनाशक गेले होते. त्याच्या जगण्याची शक्यता फार कमी होती. पण डॉक्टरांनी धीर सोडला नाही. पेशंटचे प्राण वाचवण्यात त्यांनी मोठे प्रयत्न केले. 24 दिवस रुग्णाला 5000 इंजेक्शन देण्यात आले आणि त्याचा जीव वाचवला. आता हा शेतकरी पूर्णपणे बरा झाला आहे. 

असे वाचवले प्राण...रुग्णाला श्वासही घेता येत नव्हता, त्यामुळे डॉ. प्रवीण गर्ग यांच्या टीमने सर्वप्रथम रुग्णाच्या गळ्यात छिद्र करुन त्याला ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अँटीडोट औषध एट्रोपीनचे इंजेक्शन देण्यास सुरुवात केली. रुग्णाला दररोज 208 इंजेक्शन देण्यात आले. जेणेकरून विषाचा प्रभाव संपुष्टात येईल. यासोबतच रुग्णाला औषधेही सुरुच होती.

रुग्णाला 24 दिवस डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात आले. हळूहळू रुग्णाची प्रकृती सुधारली. त्यानंतर 24 दिवसांनी रुग्ण पूर्णपणे निरोगी झाला. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. यापूर्वी अमेरिकेतही अशीच एक घटना समोर आली होती. येथे 300 मिली कीटकनाशक एका व्यक्तीच्या शरीरात गेले होते. त्याला आठ दिवस 760 इंजेक्शन देण्यात आले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानFarmerशेतकरीdoctorडॉक्टरJara hatkeजरा हटके