शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 09:25 IST

Rajyasabha Election गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागा रिक्त आहेत. गुजरात विधानसभेत भाजपाकडे १०३ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ६८ आमदार आहेत.

जयपूर : कोरोनाच्या संकटाकाळात राज्यसभा निवडणुकीच्या वाऱ्यांनी जोर पकडला आहे. गुजरातमध्येकाँग्रेसच्या काही आमदारांनी पक्ष सोडला असून राजस्थानमध्येही काँग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु आहेत. यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी टीका केली आहे. 

निवडणुकांमध्ये अशाप्रकारे घोडेबाजार करून किती दिवस राजकारण करू शकणार आहात? जर येत्या काळात भाजपाला काँग्रेसने झटका दिला तर आश्चर्य वाटायला नको. कारण आता लोकांना सारे काही समजू लागले आहे. आजची बैठक खूप चांगली झाली. प्रत्येकजण एकीवर ठाम आहे. आम्ही पुन्हा उद्या भेटणार आहोत, असे गेहलोत म्हणाले. गुजरातनंतर आता राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात आल्याने गेहलोत यांनी तातडीने आमदारांची बैठक बोलावली होती. 

याचबरोबर त्यांनी भाजपाच्या घोडेबाजाराच्या राजकारणावर टीकेचे आसूड ओढले. राज्यसभेची निवडणूक सुरू आहे. खरेतर ही निवडणूक दोन महिन्यांपूर्वीच घेता आली असती. मात्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये खरेदी-विक्री झाली नव्हती. यामुळे उशिर करण्यात आला. जरी ही निवडणूक आता घेण्यात येत असली तरीही तेव्हाची आणि आताची परिस्थिती सारखीच आहे, असे गेहलोत म्हणाले. 

काय आहे गणित?

यावेळी गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागा रिक्त आहेत. गुजरात विधानसभेत भाजपाकडे १०३ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ६८ आमदार आहेत, भारतीय आदिवासी पार्टीचे दोन (बीटीपी) आणि राष्ट्रवादीचे एक आमदार आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ३६ मते आवश्यक आहेत. आत्तापर्यंत कॉंग्रेस २ बीटीपी आमदार व एक अपक्ष अशी त्यांची संख्या ७१ मानत होती. अशा प्रकारे काँग्रेस सहजपणे २ जागा जिंकण्याचे स्वप्न पाहत होती. दुसरीकडे ३ जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपला १०६ आमदारांची गरज भासणार आहे. याचा अर्थ असा की भाजपाला तिन्ही उमेदवार जिंकण्यासाठी आणखी ३ मतांची आवश्यकता असेल. तिसरा उमेदवार म्हणून भाजपाने नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे.

 

२०१७ सारखी पुन्हा परिस्थिती

गुजरात पुन्हा एकदा २०१७ सारखी परिस्थिती दिसत आहे. २०१७ मध्ये गुजरातमध्ये भाजपाने अतिरिक्त उमेदवार उभे करुन कॉंग्रेसचे दिग्गज अहमद पटेल यांची जागा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कॉंग्रेसच्या ६ आमदारांनी निवडणुकीच्या अगदी आधी राजीनामा दिला होता. एक मत रद्दबातल झाल्यामुळे अहमद पटेल निवडून आले होते. पण त्यासाठी कॉंग्रेसला निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयात संघर्ष करावा लागला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus धक्कादायक! उत्पन्नाशिवाय एक महिनाही जगू शकत नाहीत निम्मे भारतीय; सीव्होटरचा सर्व्हे

भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपाGujaratगुजरात