शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वीर सावरकरांवरुन पुन्हा राजकारण, दहावीच्या अभ्यासक्रमात काँग्रेसने केला बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 10:38 IST

तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आला आहे.

जयपूर - राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने दहावीच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. 

राजस्थान सरकारने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशींवरुन पाठ्यक्रमात बदल करण्यात आल्याचा दावा राजस्थानमधील शिक्षण मंत्री गोविंद सिंह दोतासरा यांनी केला आहे. दोतासरा यांनी सांगितले की, मागील सरकारच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यतिरिक्त अन्य स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या योगदानाला महत्त्व दिलं नाही. मात्र पाठ्यपुस्तकात केलेल्या बदलावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. वीर सावरकरांच्या धड्यात बदल करणे म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याची टीका भाजपाने काँग्रेस सरकरावर केली आहे. 

भाजपा सरकारच्या काळात सावरकरांच्या धड्याची सुरुवात वीर सावरकर एक महान क्रांतिकारी, देशभक्त आणि संघटनवादी नेते होते. त्यांनी आजीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी तप आणि त्याग केला. त्यांचे कौतुक शब्दांमध्ये करता येणार नाही. सावरकरांनी देशातील जनतेने स्वातंत्र्यवीर उपाधी दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती असं भाजपाच्या काळातील अभ्यासक्रमात नमुद करण्यात आलं होतं. 

मात्र राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर सावरकरांवरील धड्यात बदल करण्यात आला आहे. जेलमध्ये होत असलेल्या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे चार वेळा दयेची याचिका पाठवली त्यात त्यांनी सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वत:ला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटिश सरकारने सावरकरांची याचिका स्वीकारत 1921 मध्ये त्यांना जेलमधून मुक्त केलं. तेथून सुटल्यानंतर सावरकरांनी हिंदू महासभेत प्रवेश करत देशाला हिंदूराष्ट्र बनविण्याची संकल्पना आखली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सावरकरांनी ब्रिटिश सरकारला मदत केली. 1942 च्या भारत छोडो या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत करण्याच्या आरोपाचा खटलाही सावरकरांवर सुरु होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली असा उल्लेख नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.  

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपाRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस