शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

वीर सावरकरांवरुन पुन्हा राजकारण, दहावीच्या अभ्यासक्रमात काँग्रेसने केला बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 10:38 IST

तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आला आहे.

जयपूर - राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने दहावीच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. 

राजस्थान सरकारने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशींवरुन पाठ्यक्रमात बदल करण्यात आल्याचा दावा राजस्थानमधील शिक्षण मंत्री गोविंद सिंह दोतासरा यांनी केला आहे. दोतासरा यांनी सांगितले की, मागील सरकारच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यतिरिक्त अन्य स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या योगदानाला महत्त्व दिलं नाही. मात्र पाठ्यपुस्तकात केलेल्या बदलावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. वीर सावरकरांच्या धड्यात बदल करणे म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याची टीका भाजपाने काँग्रेस सरकरावर केली आहे. 

भाजपा सरकारच्या काळात सावरकरांच्या धड्याची सुरुवात वीर सावरकर एक महान क्रांतिकारी, देशभक्त आणि संघटनवादी नेते होते. त्यांनी आजीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी तप आणि त्याग केला. त्यांचे कौतुक शब्दांमध्ये करता येणार नाही. सावरकरांनी देशातील जनतेने स्वातंत्र्यवीर उपाधी दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती असं भाजपाच्या काळातील अभ्यासक्रमात नमुद करण्यात आलं होतं. 

मात्र राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर सावरकरांवरील धड्यात बदल करण्यात आला आहे. जेलमध्ये होत असलेल्या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे चार वेळा दयेची याचिका पाठवली त्यात त्यांनी सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वत:ला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटिश सरकारने सावरकरांची याचिका स्वीकारत 1921 मध्ये त्यांना जेलमधून मुक्त केलं. तेथून सुटल्यानंतर सावरकरांनी हिंदू महासभेत प्रवेश करत देशाला हिंदूराष्ट्र बनविण्याची संकल्पना आखली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सावरकरांनी ब्रिटिश सरकारला मदत केली. 1942 च्या भारत छोडो या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत करण्याच्या आरोपाचा खटलाही सावरकरांवर सुरु होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली असा उल्लेख नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.  

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपाRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस