शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

एकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चार बहिणींचा बुडून मृत्यू; तलावात आंघोळ करताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 19:12 IST

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील तमलाव येथील रहिवासी पप्पू सिंह राजपूत यांच्या दोन मुली आशा आणि निशा तसेच त्यांचा भाऊ सुरेंद्र सिंह राजपूत यांच्या मुली चिंकी आणि निकी गावा बाहेरील तालावात आंघोळीसाठी गेल्या होत्या.

चित्तौडगड - राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यात रावतभाटा भागात शनिवारी एक मोठी घटना घडली. येथील तमलाव गावात तलावात आंघोळ करताना चार मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. या चौघीही तलावात आंघोळीसाठी गेल्या होत्या. या वेळी पाय घसरल्याने त्या तलावात बुडाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. (four sister drowned in Lake in Rajasthan)

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील तमलाव येथील रहिवासी पप्पू सिंह राजपूत यांच्या दोन मुली आशा आणि निशा तसेच त्यांचा भाऊ सुरेंद्र सिंह राजपूत यांच्या मुली चिंकी आणि निकी गावा बाहेरील तालावात आंघोळीसाठी गेल्या होत्या. तेथे एक मुलगी पाय घसरल्याने तलावात बुडू लागली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात इतर तीन बहिणीही  तालावात बुडाल्या. या मुली दुपारपर्यंतही घरी न परतल्याने कुटुंबीय तलावावर पोहोचले, तेव्हा, मुली तलावात बुडाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांत घटनेची माहिती देण्यात आली.

संपूर्ण गावावर शोककळा -माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी बोलावलेल्या लोकांनी दुपारच्या सुमारास या चारही मुलींचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. यानंतर, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रावतभाटा रुग्णालयात आणून, नंतर नातलगांना सोपविण्यात आले. या चारही मुलींचे वय दहा ते बारा वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेPoliceपोलिसWaterपाणीRajasthanराजस्थान