शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

Rajasthan Assembly Election Results: राज्यात बंडोबांचा पूर; काँग्रेस-भाजपा सत्तेपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 13:55 IST

बंडखोरांमुळे दोन्ही पक्षांना मोठा फटका

जयपूर: राजस्थानात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काही वेळापूर्वी काँग्रेस पक्ष 100 हून अधिक जागांवर आघाडीवर होता. मात्र त्यानंतर काँग्रेसची काही जागांवरील आघाडी कमी झाली. तर भाजपा जवळपास 85 मतदारसंघात आघाडीवर आहे. काँग्रेस आणि भाजपाला या निवडणुकीत बंडखोरांनी दणका दिला आहे. दोन्ही पक्षांमधील जवळपास 50 नेत्यांनी बंडाचा झेंडा उभारला. पक्षातून फुटलेले हेच नेते सध्या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. राजस्थानातील अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट मुकाबला होतो. मात्र बंडखोरांमुळे यावेळी तिरंगी सामना पाहायला मिळतो आहे. राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा आहेत. यापैकी जवळपास 5 डझन जागांवर यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. तर डझनभर जागांवर चौरंगी सामना पाहायला मिळतो आहे. निवडणुकीच्या तोंडावर हनुमान बेनीवाल यांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष स्थापन केला. या पक्षानं मारवाड आणि शेखावटी भागात जाट समाजाची मतं घेत भाजपाला धक्का दिला आहे.सत्ताधारी भाजपानं यावेळी जवळपास 70 आमदारांची तिकीटं कापली. त्यामुळे अनेकजण नाराज झाले. यातील अनेकांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आलं. मात्र काहीजणांनी बंडांचा झेंडा उभारला. वसुंधरांच्या मंत्रिमंडळातील सुरेंद्र गोयल यांनी जैतारणावरुन, राजकुमार रिणवा यांनी रतनगढमधून, ओमप्रकाश हुडला यांनी महुवामधून आणि धनसिंह रावत यांनी बांसावाडामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. तर आमदार अनिता कटारा यांनी सागवाडामधून, देवेंद्र कटारा यांनी डुंगरपूरहून, नवनीत लाल निनामा यांनी घाटोलहून, किशनाराम नाई यांनी श्रीडूंगरगढमधून आणि गीता वर्मा यांनी सिकरायमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.  राज्यात सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसलादेखील बंडखोरांनी दणका दिला. राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताधारी पक्ष बदलतो. त्यामुळे काँग्रेसमधील अनेकजण तिकीटासाठी उत्सुक होते. त्यामुळेच तिकीटं जाहीर होताच बंडखोरी झाली. माजी केंद्रीय मंत्री महादेव सिंह खंडेला यांनी खंडेलामधून, माजी मंत्री बाबुलाल नागर यांनी दूदूमधून, माजी मंत्री रामकेश मीणा यांनी गंगापूर सिटीमधून, माजी आमदार संजय लोढा यांनी सिरोहीतून, माजी उपमुख्यमंत्री कमला बेनीवाल यांचे पुत्र आलोक बेनीवाल यांनी शाहपूरमधून आणि विक्रम सिंह शेखावत यांनी जयपूरमधील विद्याधर नगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा