शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

देशातील ११५ जिल्ह्यांमधील पावसात झाली घट; भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 09:31 IST

गेल्या ३० वर्षांचा अभ्यास : ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम

ठळक मुद्देमहाराष्ट्रासह काही राज्यांतील पावसाळी दिवसांमध्ये वाढ

पुणे : ग्लोबल वॉर्मिंगचा भारतातील पाऊसमानावर काय परिणाम होत आहे, याचा अभ्यास भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी केला असून त्यात पाच राज्ये वगळता अन्य राज्यांतील पावसामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याच वेळी महाराष्ट्रासह काही राज्यांतील पावसाळी दिवसांमध्ये वाढ होत आहे. मात्र, देशातील ११५ जिल्ह्यांमधील पावसाच्या प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून आले आहे.यापूर्वी भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी १९०१ ते २०१० या ११० वर्षांत पावसात कसा बदल झाला, याचा अभ्यास केला होता. आता केवळ ग्लोबल वॉर्मिंगचा काय परिणाम झाला, या दृष्टीने भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी १९८९ ते २०१८ या ३० वर्षांत देशभरात पडलेल्या पावसाचा अभ्यास केला असून त्यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. संसदेच्या निदेशनानुसार भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय आणि नागालँडमध्ये पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. या राज्यांबरोबरच अरुणाचल व हिमाचल प्रदेशात संपूर्ण वर्षभर पडणाऱ्या पावसांमध्ये घट झाल्याचे या अभ्यासातून दिसून येते. महाराष्ट्रात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ८९ टक्के पाऊस हा पावसाळ्यातील चार महिन्यांत पडतो.कोकण, गोवा, सौराष्ट्र आणि कच्छ, राजस्थानचा दक्षिण भाग, तमिळनाडूचा उत्तर भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग व त्याच्या लगतचा दक्षिण पश्चिम ओडिशा, छत्तीसगडचा बहुतांश भाग, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोराम आणि उत्तराखंड या भागातील पावसात वाढ झाली आहे. औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण घटले देशातील ११५ जिल्ह्यांत वर्षभरात पडणाºया पावसामध्ये घट झाली असून त्यात महाराष्ट्रातील औरंगाबाद व परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये पावसाळ्यातील चार महिन्यांत सरासरी ६४८.७ मिमी, तर वर्षभरात ७८९.७ मिमी पाऊस पडतो. त्या वेळी परभणीमध्ये चार महिन्यांत सरासरी ७०७ मिमी पाऊस पडतो, तर वर्षभरात ९६२ मिमी पाऊस पडतो.  या पाऊसमानात घट होत असल्याचे गेल्या ३० वर्षांतील आकडेवारीवरून दिसून येत आहे...........ड्राय डेमध्ये झालेली वाढपावसाळ्यात पाऊस न पडलेल्या दिवसांमध्ये वाढ झालेल्यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील दक्षिण किनारपट्टीचा प्रदेश, बिहार, छत्तीसगडचा उत्तर भाग, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल त्याचबरोबर संपूर्ण वर्षाचा विचार केला तर या प्रदेशांसह तेलंगणामध्ये पाऊस न पडलेल्या दिवसांमध्ये वाढ झालेली दिसते. त्या वेळी गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमध्ये पाऊस न पडलेल्या दिवसांची संख्या कमी झालेली दिसून येते...........पावसाळी दिवसांमध्ये घट :पुणे, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांत पावसाळी दिवसांमध्ये घट होताना दिसत आहे. त्याचबरोबर, जोरदार पावसाच्या दिवसांमध्ये घट झाली आहे............पावसाळी दिवसांमध्ये वाढ : नंदुरबार, जळगाव, रायगड, कोल्हापूर आणि भंडारा या जिल्ह्यांतील पावसाळी दिवसांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच, या जिल्ह्यांत जोरदार पावसाच्या दिवसांतही वाढ झालेली दिसते.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानTemperatureतापमानenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण