शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं रेल्वेचं एक पाऊल पुढे; पाच वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 16:46 IST

गेल्या वर्षभरात अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट

नवी दिल्ली: असुरक्षित प्रवासामुळे कायम रडारवर असणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वर्षभरात चांगली सुधारणा झाली आहे. सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2018 या वर्षभराच्या कालावधीत 75 रेल्वेअपघातांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 वर्षांमधील रेल्वे दुर्घटना आणि त्यातील बळींची संख्या लक्षात घेतल्यास, गेल्या वर्षभरात सुरक्षेच्या बाबतीत रेल्वेची कामगिरी सुधारली आहे. रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सरकारी आकड्यांचा आधार घेऊन ही माहिती दिली. सप्टेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत आठ अपघातांमध्ये 249 लोकांचा मृत्यू झाला होता. यातील इंदूर-पाटणा एक्स्प्रेसला झालेला अपघात सर्वात भीषण होता. नोव्हेंबर 2016 मध्ये इंदूर-पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्यानं झालेल्या अपघातात 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र गेल्या वर्षभरात रेल्वे अपघातांमध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या 40 वर आली आहे. या काळात दोन मोठे रेल्वे अपघात झाले. ऑगस्ट 2017 मध्ये उत्कल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला. तर यावर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशात एका शाळेच्या बसला रेल्वेनं धडक दिल्यानं 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर 2013 ते ऑगस्ट 2014 या कालावधीत 139 रेल्वे अपघात झाले होते. त्यात 275 लोकांचा मृत्यू झाला होता. 2014 ते 2015 या कालावधीत 108 अपघातांमध्ये 196 जणांनी जीव गमावला होता. '1 सप्टेंबर 2013 ते 31 ऑगस्ट 2014 या कालावधीतील आकड्यांची तुलना 1 सप्टेंबर 2017 ते  31 ऑगस्ट 2018 या कालावधीतील अपघातांच्या आकडेवारीशी केल्यास दुर्घटनांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. रेल्वे गाड्यांची धडक आणि रेल्वे गाड्या रुळांवरुन घसरण्याच्या घटनांचं प्रमाण 62 वरुन 4 वर आलं आहे,' अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात