शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं रेल्वेचं एक पाऊल पुढे; पाच वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 16:46 IST

गेल्या वर्षभरात अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट

नवी दिल्ली: असुरक्षित प्रवासामुळे कायम रडारवर असणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वर्षभरात चांगली सुधारणा झाली आहे. सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2018 या वर्षभराच्या कालावधीत 75 रेल्वेअपघातांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 वर्षांमधील रेल्वे दुर्घटना आणि त्यातील बळींची संख्या लक्षात घेतल्यास, गेल्या वर्षभरात सुरक्षेच्या बाबतीत रेल्वेची कामगिरी सुधारली आहे. रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सरकारी आकड्यांचा आधार घेऊन ही माहिती दिली. सप्टेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत आठ अपघातांमध्ये 249 लोकांचा मृत्यू झाला होता. यातील इंदूर-पाटणा एक्स्प्रेसला झालेला अपघात सर्वात भीषण होता. नोव्हेंबर 2016 मध्ये इंदूर-पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्यानं झालेल्या अपघातात 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र गेल्या वर्षभरात रेल्वे अपघातांमध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या 40 वर आली आहे. या काळात दोन मोठे रेल्वे अपघात झाले. ऑगस्ट 2017 मध्ये उत्कल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला. तर यावर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशात एका शाळेच्या बसला रेल्वेनं धडक दिल्यानं 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर 2013 ते ऑगस्ट 2014 या कालावधीत 139 रेल्वे अपघात झाले होते. त्यात 275 लोकांचा मृत्यू झाला होता. 2014 ते 2015 या कालावधीत 108 अपघातांमध्ये 196 जणांनी जीव गमावला होता. '1 सप्टेंबर 2013 ते 31 ऑगस्ट 2014 या कालावधीतील आकड्यांची तुलना 1 सप्टेंबर 2017 ते  31 ऑगस्ट 2018 या कालावधीतील अपघातांच्या आकडेवारीशी केल्यास दुर्घटनांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. रेल्वे गाड्यांची धडक आणि रेल्वे गाड्या रुळांवरुन घसरण्याच्या घटनांचं प्रमाण 62 वरुन 4 वर आलं आहे,' अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात