शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : लातुरातील रेल्वे डब्यांच्या कारखान्यातून ३० लाख नोक-या, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 04:49 IST

वर्षानुवर्षे चालत आलेली रेल्वे बजेटची परंपरा आता सरकारने समाप्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमधील मुख्य बाबी सांगितल्या. त्यामुळे रेल्वे बजेटही आता अर्थसंकल्पाचा भाग झाले आहे. अर्थात त्यांनी रेल्वे बजेट ५० हजार कोटी रुपयांवरून वाढवून दीड लाख कोटी रुपये करण्याचा मनोदय व्यक्त केला.

- विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वर्षानुवर्षे चालत आलेली रेल्वे बजेटची परंपरा आता सरकारने समाप्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमधील मुख्य बाबी सांगितल्या. त्यामुळे रेल्वे बजेटही आता अर्थसंकल्पाचा भाग झाले आहे. अर्थात त्यांनी रेल्वे बजेट ५० हजार कोटी रुपयांवरून वाढवून दीड लाख कोटी रुपये करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याचप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी अनेक योजनांचा उल्लेख केला. या योजना नेमक्या काय आहेत? कधी सुरू होणार? याबाबत ‘लोकमत’ने रेल्वेमंत्री आणि मुंबईकर पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली.अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या बजेटला आपण किती मार्क देता? तथापि, रेल्वेमंत्री असूनही आपण आपले भाषण वाचू शकला नाहीत याबाबत आपल्याला काही दु:ख नाही का? कारण, बजेट सादर करण्याचे अधिकार रेल्वेमंत्र्यांकडे आता राहिला नाही, असा सवाल केला असता पीयूष गोयल म्हणाले की, जेटली यांना मी १० पैकी ११ मार्क देतो. याचे कारण असे आहे की, यात सर्वांना न्याय देण्यात आला आहेच; पण रेल्वे बजेटसाठी यूपीए सरकारच्या तुलनेत तीन पट अधिक पैसा दिला आहे. राहिला मुद्दा भाषण वाचण्याचा, तर रेल्वे हा एक विभाग आहे, असे तर प्रत्येक विभागाला आपले बजेट वाचण्याची संधी द्यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट निर्देश आहेत की, आम्ही केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. निकाल आपोआप येतील. हाच मंत्र स्वीकारून आम्ही काम करत आहोत.या अर्थसंकल्पात रेल्वेला एवढा पैसा मिळाला आहे. याचा उपयोग कसा होणार? सामान्य प्रवाशांना काय लाभ होणार? असे विचारले असता गोयल म्हणाले की, रेल्वेसाठी एवढे बजेट दिल्याबद्दल पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे मी आभार मानतो. यातील जवळपास ७३ ते ७५ हजार कोटी रुपये फक्त सुरक्षेसाठी खर्च होणार आहेत. याचा थेट सामान्य प्रवाशांना लाभ होणार आहे. एवढी मोठी रक्कम प्रथमच सुरक्षेवर खर्च होत आहे.यामुळे रेल्वे उशिरा धावणे व उशिरा येणे ही परिस्थिती सुधारणार आहे का? प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. डब्यांची अवस्था वाईट आहे. असे विचारले असता ते म्हणाले की, ही परिस्थिती आहे हे मी मान्य करतो; परंतु हे का घडते हे समजून घेतले पाहिजे. आतापर्यंत फक्त रेल्वेगाड्याच चालवल्या जात होत्या. आम्ही रेल्वेरूळ बदलण्याचे काम सुरू केले आहे. ते काम वेगात सुरू आहे. आम्हाला ३००० किलोमीटर रेल्वेरूळ बदलण्याचे लक्ष्य दिलेले आहे. आम्ही जानेवारीअखेर ३६०० पेक्षा जास्त किलोमीटरचे काम पूर्णही केले आहे. मार्चअखेर ते काम ४.५ हजार किलोमीटरचे पूर्ण होईल. पुढच्या वर्षी गाड्या उशिरा धावणे व येणे हे पूर्णपणे बंद होईल. नवे डबे जोडले जातील. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवरही वेगाने काम सुरू आहे.मुंबईसाठी मोठी घोषणा झाली आहे. तिला कसा लाभ होईल? असे विचारले असता ते म्हणाले की, रेल्वेमंत्री व मुंबईकर या नात्याने मुंबईला उपनगरी मार्गांसाठी प्रथमच एवढे बजेट मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. नव्या मार्गांचा विस्तार करणे, नव्या एलिव्हेटेड कॉरिडॉरची तातडीने गरज आहे. आधीच सुरू असलेल्या ११ हजार कोटी रुपयांच्या योजनेबरोबर उपनगरी रेल्वेसाठी ४० हजार कोटी रुपये मिळाले आहेत.भजे विकणाºयाचे कामही तुम्ही नोकरी समजता, असा काँग्रेसचा आरोप आहे, असे विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसची अडचण ही आहे, की तो पक्ष कोणत्याही कामाला त्याचा स्वाभाविक सन्मान देत नाही. भजे विकणारी एक सन्माननीय व्यक्ती नाही का? चहा विकणाºयाचे काम हे सन्मानास पात्र नाही का? भजे किंवा चहा विकण्यातून रोजगार निर्माण होतो हे आपण स्वीकारले पाहिजे. अशा व्यक्तींच्या कामातून देशाच्या विकासाला हातभार लागत नाही का? या कामातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षही रोजगार निर्माण होत असतात. अशी अनेक क्षेत्रे समोर आली आहेत, की त्यातून रोजगार निर्माण होऊ शकतो, असा कधी कोणी विचारही केलेला नाही. यात फूल विकण्यापासून अ‍ॅपआधारित अनेक सेवांचा समावेश आहे.रेल्वे बजेटमुळे महाराष्ट्रात रेल्वेची बरीच विकासकामे होतील. लातूरमध्ये रेल्वेडब्यांचा कारखाना सुरू झाला की, ३० लाखांपेक्षा जास्त नोक-या मिळतील. अर्थात या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा असतील.मुंबई व इतर भागांत सुरू होणाºया कामांमुळे जवळपास ३० लाख नोकºया प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निर्माण होतील. लातूर, नागपूर, वर्धा, मुंबई अशा सगळ्या ठिकाणी लोकांना लाभ होणार आहे. हायस्पीड रेल्वे सुरू होण्याच्या प्रक्रियेनेही महाराष्ट्राला नोकरी व्यवसायाचा लाभ होईल.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Indian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयल