शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:05 IST

Acharya Pramod Krishnam : काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच काँग्रेसचे माजी नेते आणि संभलच्या कल्की धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. देशावर प्रेम करणारे लोक या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे आहेत. जो पंतप्रधानांसोबत नाही, तो देशद्रोही आहे, असे विधान आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केले आहे. यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "हे धार्मिक युद्ध आहे. जे रामाचे नाहीत, ते राष्ट्राचे होऊ शकत नाहीत. जर या निवडणुकीत ज्या लोकांचे देशावर प्रेम आहे, ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे राहतील. जे मोदींच्या पाठीशी उभे राहणार नाहीत, त्यांना देशद्रोही म्हटले जाईल." याचबरोबर, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

सरकार स्थापन झाल्यास राम मंदिराचा निर्णय मागे घेऊ, असे राहुल म्हणाले होते, असे आचार्य प्रमोद यांनी सांगितले. "राम मंदिराचा निर्णय आल्यावर राहुल गांधी यांनी अमेरिकेत राहणाऱ्या एका हितचिंतकाच्या इशाऱ्यावरून म्हणाले होते की, आमचे सरकार स्थापन झाले तर आम्ही महासत्ता आयोग स्थापन करून राम मंदिराबाबतचा निर्णय मागे घेऊ. तेव्हा शाहबानोचा निर्णय रद्द केला जाऊ शकतो, तर राम मंदिराचा निर्णय का नाही?" असा सवालही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी शनिवारी (४ मे) सांगितले की, काँग्रेस लवकरच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या रूपाने दोन भागात विभागली जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, "काँग्रेस पुन्हा दोन गटात विभागली जाईल, एक राहुल गांधींचा गट आणि दुसरा प्रियंका गांधींचा गट असेल." तसेच, राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, मला वाटते राहुल गांधींनी रायबरेलीऐवजी रावळपिंडीतून निवडणूक लढवावी, कारण पाकिस्तानमध्ये त्यांची लोकप्रियता आणि मागणी वाढत आहे.

ज्या पद्धतीने राहुल गांधी अमेठी सोडून गेले, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "प्रियांका गांधी निवडणूक लढवत नाहीत - हे आता त्यांच्या समर्थकांच्या हृदयात ज्वालामुखीचे रूप धारण करत आहे, जो 4 जूननंतर फुटेल." दरम्यान,  काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले आहे. तर राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी