शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:05 IST

Acharya Pramod Krishnam : काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच काँग्रेसचे माजी नेते आणि संभलच्या कल्की धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. देशावर प्रेम करणारे लोक या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे आहेत. जो पंतप्रधानांसोबत नाही, तो देशद्रोही आहे, असे विधान आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केले आहे. यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "हे धार्मिक युद्ध आहे. जे रामाचे नाहीत, ते राष्ट्राचे होऊ शकत नाहीत. जर या निवडणुकीत ज्या लोकांचे देशावर प्रेम आहे, ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे राहतील. जे मोदींच्या पाठीशी उभे राहणार नाहीत, त्यांना देशद्रोही म्हटले जाईल." याचबरोबर, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

सरकार स्थापन झाल्यास राम मंदिराचा निर्णय मागे घेऊ, असे राहुल म्हणाले होते, असे आचार्य प्रमोद यांनी सांगितले. "राम मंदिराचा निर्णय आल्यावर राहुल गांधी यांनी अमेरिकेत राहणाऱ्या एका हितचिंतकाच्या इशाऱ्यावरून म्हणाले होते की, आमचे सरकार स्थापन झाले तर आम्ही महासत्ता आयोग स्थापन करून राम मंदिराबाबतचा निर्णय मागे घेऊ. तेव्हा शाहबानोचा निर्णय रद्द केला जाऊ शकतो, तर राम मंदिराचा निर्णय का नाही?" असा सवालही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी शनिवारी (४ मे) सांगितले की, काँग्रेस लवकरच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या रूपाने दोन भागात विभागली जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, "काँग्रेस पुन्हा दोन गटात विभागली जाईल, एक राहुल गांधींचा गट आणि दुसरा प्रियंका गांधींचा गट असेल." तसेच, राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, मला वाटते राहुल गांधींनी रायबरेलीऐवजी रावळपिंडीतून निवडणूक लढवावी, कारण पाकिस्तानमध्ये त्यांची लोकप्रियता आणि मागणी वाढत आहे.

ज्या पद्धतीने राहुल गांधी अमेठी सोडून गेले, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "प्रियांका गांधी निवडणूक लढवत नाहीत - हे आता त्यांच्या समर्थकांच्या हृदयात ज्वालामुखीचे रूप धारण करत आहे, जो 4 जूननंतर फुटेल." दरम्यान,  काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले आहे. तर राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी