शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:05 IST

Acharya Pramod Krishnam : काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच काँग्रेसचे माजी नेते आणि संभलच्या कल्की धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. देशावर प्रेम करणारे लोक या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे आहेत. जो पंतप्रधानांसोबत नाही, तो देशद्रोही आहे, असे विधान आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केले आहे. यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "हे धार्मिक युद्ध आहे. जे रामाचे नाहीत, ते राष्ट्राचे होऊ शकत नाहीत. जर या निवडणुकीत ज्या लोकांचे देशावर प्रेम आहे, ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे राहतील. जे मोदींच्या पाठीशी उभे राहणार नाहीत, त्यांना देशद्रोही म्हटले जाईल." याचबरोबर, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

सरकार स्थापन झाल्यास राम मंदिराचा निर्णय मागे घेऊ, असे राहुल म्हणाले होते, असे आचार्य प्रमोद यांनी सांगितले. "राम मंदिराचा निर्णय आल्यावर राहुल गांधी यांनी अमेरिकेत राहणाऱ्या एका हितचिंतकाच्या इशाऱ्यावरून म्हणाले होते की, आमचे सरकार स्थापन झाले तर आम्ही महासत्ता आयोग स्थापन करून राम मंदिराबाबतचा निर्णय मागे घेऊ. तेव्हा शाहबानोचा निर्णय रद्द केला जाऊ शकतो, तर राम मंदिराचा निर्णय का नाही?" असा सवालही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी शनिवारी (४ मे) सांगितले की, काँग्रेस लवकरच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या रूपाने दोन भागात विभागली जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, "काँग्रेस पुन्हा दोन गटात विभागली जाईल, एक राहुल गांधींचा गट आणि दुसरा प्रियंका गांधींचा गट असेल." तसेच, राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, मला वाटते राहुल गांधींनी रायबरेलीऐवजी रावळपिंडीतून निवडणूक लढवावी, कारण पाकिस्तानमध्ये त्यांची लोकप्रियता आणि मागणी वाढत आहे.

ज्या पद्धतीने राहुल गांधी अमेठी सोडून गेले, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "प्रियांका गांधी निवडणूक लढवत नाहीत - हे आता त्यांच्या समर्थकांच्या हृदयात ज्वालामुखीचे रूप धारण करत आहे, जो 4 जूननंतर फुटेल." दरम्यान,  काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले आहे. तर राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी