शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: 'याला कोण चांगले दिवस म्हणतं?', राहुल गांधींचा आंदोलक तरुणांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 19:31 IST

राहुल गांधींनी रेल्वे भर्ती बोर्ड-एनटीपीसी परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात आंदोलन करत असलेल्या तरुणांना पाठिंबा दिला आणि सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी शुक्रवारी रेल्वे भरती बोर्ड-एनटीपीसी परीक्षेच्या (RRB NTPC Exam)  नियम आणि निकालाविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांना पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधला. 'याला चांगले दिवस कोण म्हणतो?', असा सवाल त्यांनी केला. 

राहुल गांधींनी एका तरुणाचा व्हिडिओ शेअर करत ट्विट केले की, 'विद्यार्थी बरोबर आहेत. त्यांची वेदना खरी आहे. कोण म्हणतं आजचे दिवस चांगले आहेत?" राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण म्हणतोय की, माझ्या महिन्याचा खर्च पाठवण्यासाठी त्याची आई आजारी असतानाही तिचे औषध घेत नाहीये. दरम्यान, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आंदोलक तरुणांवर पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत काँग्रेस युवा आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

गुन्हे परत घेण्याची काँग्रेसची मागणीयावेळी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी आरोप केला की, "नरेंद्र मोदी सरकार तरुणांवर केवळ नोकऱ्यांची मागणी करत असल्याने त्यांच्यावर अत्याचार करत आहे. सरकारने हे समजून घेतले पाहिजे की ते लाठीमार करून तरुणांचा आवाज दाबू शकत नाहीत. सरकारने विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

परीक्षा पुढे ढकलल्यादेशातील विविध भागांत झालेल्या आंदोलनानंतर रेल्वे मंत्रालयाने बुधवारी नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (RRB-NTPC) आणि लेव्हल 2 च्या परीक्षा पुढे ढकलल्या. परीक्षा दोन टप्प्यात घेण्याच्या रेल्वेच्या निर्णयाला उमेदवारांकडून विरोध होत आहे. त्यांचे म्हणणे आहे की अंतिम निवडीचा दुसरा टप्पा म्हणजे संगणक आधारित चाचणी (CBT) साठी RRB-NTPC च्या पहिल्या टप्प्यात उपस्थित आणि पात्र ठरलेल्यांची फसवणूक करण्यासारखे आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीrailwayरेल्वेcongressकाँग्रेस