शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पेगॅससचा वापर मोदींनी देशाविरोधात केला; राहुल गांधी यांनी सरकारला केले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 06:15 IST

मोदी सरकारवर  हल्ला करताना गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आणि मोदी यांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

शीलेश शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पेगॅससचा प्रयोग केला गेला. राफेल लढाऊ विमान खरेदीची चौकशी थांबवण्यासाठी पेगाससचा प्रयोग केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शस्त्र आमच्या देशाविरोधात वापरले असून त्यासाठी फक्त एकच शब्द आहे ‘देशद्रोह’, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पेगासस पाळतप्रकरणी म्हटले. मोदी सरकारवर  हल्ला करताना गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आणि मोदी यांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली. राहुल गांधी यांनी इस्रायलने पेगाससला क्लासिफाइड शस्त्राच्या यादीत ठेवले आहे. ते अतिरेकी आणि गुन्हेगारांसाठी वापरले जाते; परंतु मोदी आणि शहा देशाविरोधातच ते वापरत आहेत, असा आरोप केला.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पेगॅसस पाळतप्रकरणी विचारले की, पेगॅसस सॉफ्टवेअर सरकार किंवा सरकारच्या कोणत्या एजन्सीने विकत घेतले आहे का? जर सरकारने विकत घेतले असेल तर जे सॉफ्टवेअर दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या लोकांवर वापरले जायला हवे ते आपलेच अधिकारी, आपलेच राजकीय नेते, आपल्याच पक्षाचे नेते, पत्रकार, कार्यकर्ते, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित लोकांवर वापरले गेले? जर सरकारने वापरले नाही तर मग सरकारने हेरगिरी केली.

पाळतीविरोधात दिल्या घोषणा

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, शशी थरूर, पी. चिदम्बरम, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाच्या बहुतांश खासदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी पाळतीच्या विरोधात घोषणा दिल्या. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार