शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

'आमच्याकडे दुर्लक्ष केले, संवादाचे मार्गही बंद होते', म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:12 IST

"भारतात माझ्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते."

Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra :काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी त्यांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी राहुल यांना 'भारत जोडो' यात्रेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "या दौऱ्यामुळे माझा राजकीय दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. भारतीय राजकारणात प्रेमाचा परिचय करुन देणे, हा या दौऱ्याचा उद्देश होता. या दौऱ्यात मला अनेक धडे मिळाले, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम ही संकल्पना राजकारणात राबवता येते."

भारत जोडो यात्रा का करावी लागली?यावेळी राहुल गांधींनीभारत जोडो यात्रा सुरू करण्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, "भारतात माझ्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. मी संसदेत दिलेले भाषण टीव्हीवर दाखवले जात नव्हते, माध्यमांनीही माझ्याकडे दुर्लक्ष केले होते. मला कायदेशीर मदतही मिळत नव्हती. अशा परिस्थितीत आमच्या लक्षात आले की, माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचू शकत नसलो, तरी थेट लोकांपर्यंत जाणे हाच उत्तम मार्ग आहे. त्यामुळेच मी देशभरात 4000 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला."

ही आध्यात्मिक यात्रा होती"सुरुवातीला गुडघ्याच्या समस्येमुळे मला अडचणींचा सामना करावा लागला. पहिले 3-4 दिवस वाटले की, आपण यात्रा काढून चूक केली. पण, हळुहळू मला याची सवय झाली. या दौऱ्याने माझा लोकांशी संवाद साधण्याचा मार्ग पूर्णपणे बदलून गेला. या दौऱ्याचा सर्वात प्रभावशाली पैलू म्हणजे, भारतीय राजकारणात 'प्रेम' या संकल्पनेची ओळख झाली. राजकारणात सामान्यतः 'प्रेम' सारखे शब्द वापरले जात नाहीत, उलट द्वेष, राग, अन्याय आणि भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टी प्रमुख असतात. पण, भारत जोडो यात्रेने या नव्या कल्पनेला भारतीय राजकारणात स्थान दिले. ही फक्त भौतिक यात्रा नव्हती, तर एक आध्यात्मिक यात्राही होती, ज्यामुळे आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला," असेही राहुल यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपा