शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

'आमच्याकडे दुर्लक्ष केले, संवादाचे मार्गही बंद होते', म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:12 IST

"भारतात माझ्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते."

Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra :काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी त्यांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी राहुल यांना 'भारत जोडो' यात्रेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "या दौऱ्यामुळे माझा राजकीय दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. भारतीय राजकारणात प्रेमाचा परिचय करुन देणे, हा या दौऱ्याचा उद्देश होता. या दौऱ्यात मला अनेक धडे मिळाले, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम ही संकल्पना राजकारणात राबवता येते."

भारत जोडो यात्रा का करावी लागली?यावेळी राहुल गांधींनीभारत जोडो यात्रा सुरू करण्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, "भारतात माझ्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. मी संसदेत दिलेले भाषण टीव्हीवर दाखवले जात नव्हते, माध्यमांनीही माझ्याकडे दुर्लक्ष केले होते. मला कायदेशीर मदतही मिळत नव्हती. अशा परिस्थितीत आमच्या लक्षात आले की, माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचू शकत नसलो, तरी थेट लोकांपर्यंत जाणे हाच उत्तम मार्ग आहे. त्यामुळेच मी देशभरात 4000 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला."

ही आध्यात्मिक यात्रा होती"सुरुवातीला गुडघ्याच्या समस्येमुळे मला अडचणींचा सामना करावा लागला. पहिले 3-4 दिवस वाटले की, आपण यात्रा काढून चूक केली. पण, हळुहळू मला याची सवय झाली. या दौऱ्याने माझा लोकांशी संवाद साधण्याचा मार्ग पूर्णपणे बदलून गेला. या दौऱ्याचा सर्वात प्रभावशाली पैलू म्हणजे, भारतीय राजकारणात 'प्रेम' या संकल्पनेची ओळख झाली. राजकारणात सामान्यतः 'प्रेम' सारखे शब्द वापरले जात नाहीत, उलट द्वेष, राग, अन्याय आणि भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टी प्रमुख असतात. पण, भारत जोडो यात्रेने या नव्या कल्पनेला भारतीय राजकारणात स्थान दिले. ही फक्त भौतिक यात्रा नव्हती, तर एक आध्यात्मिक यात्राही होती, ज्यामुळे आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला," असेही राहुल यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपा