शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं : गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 13:32 IST

आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नाही, आझाद यांचा निशाणा.

काही दिवसांपूर्वीच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा हात सोडला होता आणि त्यानंतर टीकाही केली होती. परंतु आता पुन्हा एकदा आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्यात राजकीय कौशल्य नाही आणि त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नसल्याचंही आझाद म्हणाले. “मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं,” असंही ते म्हणाले.

“कोण स्वतः आपलं घर सोडतो. माझ्या कुटुंबीयांनी मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले. जेव्हा घरच्यांना वाटतं की हा माणूस नको आहे. घरातच जर आपल्याला परकं समजलं जाऊ लागलं तर? पुढे-मागे करणाऱ्या किंवा ट्वीट करणाऱ्या लोकांनाच पक्षात पद मिळतं,” असं काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर आझाद म्हणाले.

जे लोक माझा डीएनए मोदी वाला असल्याची चर्चा करतात त्यांनी आधी स्वत:ला पाहावं. पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते, काँग्रेसमुक्त भारत. ज्या लोकांनी काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी त्यांची मदत केली, त्यांनी मोदींची भेट घेतल्याचंही ते म्हणाले. लोकसभेत भाषणादरम्यान त्यांची गळाभेट गेतली आणि म्हटलं की तुमच्यासाठी आमच्या मनात काही नाही. मग ते भेटले की आम्ही?, असं म्हणत आझाद यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

मोदींची स्तुतीआझाद यांनी चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. “ज्या लोकांना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काही दिसते ते योग्य नाही. जर कोणी इतकंच अशिक्षित असेल, तर त्यानं पंतप्रधानांचं भाषण ऐकावं. मोदींनी लग्न केलं नाही, त्यांची मुलं नाहीत.. मी त्यांना क्रूर समजत होतो, परंतु त्यांनी माणूसकी दाखवली,” असंही आझाद यांनी नमूद केलं.

सोनिया गांधींबाबतही वक्तव्यसोनिया गांधी यांनी १९९८ ते २००४ दरम्यान, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचं काम केलं. त्या ज्येष्ठ नेत्यांकडून सल्ला घेत होत्या. त्या त्यांच्यावर अवलंबून होत्या आणि त्यांचे सल्लेही ऐकत होत्या. त्यांनी मला आठ राज्यांची जबाबदारी दिली होती. त्यापैकी सात राज्यांमध्ये मी विजय मिळवून दिला होता. त्या कधीही हस्तक्षेप करत नव्हत्या. परंतु २००४ नंतर राहुल गांधींचा प्रवेश झाला आणि ही पद्धत संपली. सोनिया गांधींचं राहुल गांधीवरील अवलंबत्व वाढलं. परंतु राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही. राहुल गांधींशी सर्वांनी समन्वय साधावा असं त्यांना वाटत असल्याचंही आझाद यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी