शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं : गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 13:32 IST

आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नाही, आझाद यांचा निशाणा.

काही दिवसांपूर्वीच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा हात सोडला होता आणि त्यानंतर टीकाही केली होती. परंतु आता पुन्हा एकदा आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्यात राजकीय कौशल्य नाही आणि त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नसल्याचंही आझाद म्हणाले. “मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं,” असंही ते म्हणाले.

“कोण स्वतः आपलं घर सोडतो. माझ्या कुटुंबीयांनी मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले. जेव्हा घरच्यांना वाटतं की हा माणूस नको आहे. घरातच जर आपल्याला परकं समजलं जाऊ लागलं तर? पुढे-मागे करणाऱ्या किंवा ट्वीट करणाऱ्या लोकांनाच पक्षात पद मिळतं,” असं काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर आझाद म्हणाले.

जे लोक माझा डीएनए मोदी वाला असल्याची चर्चा करतात त्यांनी आधी स्वत:ला पाहावं. पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते, काँग्रेसमुक्त भारत. ज्या लोकांनी काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी त्यांची मदत केली, त्यांनी मोदींची भेट घेतल्याचंही ते म्हणाले. लोकसभेत भाषणादरम्यान त्यांची गळाभेट गेतली आणि म्हटलं की तुमच्यासाठी आमच्या मनात काही नाही. मग ते भेटले की आम्ही?, असं म्हणत आझाद यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

मोदींची स्तुतीआझाद यांनी चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. “ज्या लोकांना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काही दिसते ते योग्य नाही. जर कोणी इतकंच अशिक्षित असेल, तर त्यानं पंतप्रधानांचं भाषण ऐकावं. मोदींनी लग्न केलं नाही, त्यांची मुलं नाहीत.. मी त्यांना क्रूर समजत होतो, परंतु त्यांनी माणूसकी दाखवली,” असंही आझाद यांनी नमूद केलं.

सोनिया गांधींबाबतही वक्तव्यसोनिया गांधी यांनी १९९८ ते २००४ दरम्यान, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचं काम केलं. त्या ज्येष्ठ नेत्यांकडून सल्ला घेत होत्या. त्या त्यांच्यावर अवलंबून होत्या आणि त्यांचे सल्लेही ऐकत होत्या. त्यांनी मला आठ राज्यांची जबाबदारी दिली होती. त्यापैकी सात राज्यांमध्ये मी विजय मिळवून दिला होता. त्या कधीही हस्तक्षेप करत नव्हत्या. परंतु २००४ नंतर राहुल गांधींचा प्रवेश झाला आणि ही पद्धत संपली. सोनिया गांधींचं राहुल गांधीवरील अवलंबत्व वाढलं. परंतु राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही. राहुल गांधींशी सर्वांनी समन्वय साधावा असं त्यांना वाटत असल्याचंही आझाद यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी