शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राफेल डील फक्त आणि फक्त अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी- राहुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:14 IST

राफेल प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्षांचा आक्रमक पवित्रा कायम

नवी दिल्ली: राफेल डीलवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपली असताना आज राज्यसभेत कॅगचा अहवाल मांडण्यात आला. एनडीए सरकारनं केलेला करार यूपीए सरकारपेक्षा स्वस्त असल्याची माहिती या अहवालातून समोर आली. त्यामुळे राफेल डीलवरुन सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर भाजपानं निशाणा साधला. मात्र यानंतरही राहुल गांधी त्यांच्या दाव्यांवर ठाम आहेत. अनिल अंबानींना 30 हजार कोटी रुपये देता यावे, याचसाठी मोदींनी राफेल करार केल्याचा आरोप राहुल यांनी पत्रकार परिषदेत केला. राफेल करारात कोट्यवधी रुपये वाचवल्याचा दावा मोदी सरकारनं केला होता. मात्र सरकारनं यातून केवळ 2.86 टक्के इतकीच रक्कम वाचल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सरकारनं दिलेला आकडा कॅगच्या अहवालात कमी झाला, असं इतिहासात पहिल्यांदा घडल्याचा दावा राहुल यांनी केला. याशिवाय त्यांनी या अहवालावर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केलं. 'हवाई दलाला विमानांची गरज आहे, असं पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षणमंत्र्यांनी नेहमीच म्हटलं आहे. हवाई दलात लवकरात लवकर नव्या विमानांचा समावेश व्हावा, असं पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांनी वारंवार देशाला सांगितलं. मात्र नव्या करारामुळे राफेल विमानं देशात येण्यास उशीर होणार आहे,' असं म्हणत त्यांनी या कराराबद्दल पुन्हा एकदा शंका उपस्थित केली. कॅगचा अहवाल नीट पाहिल्यास अनेक महत्त्वपूर्ण माहिती गोष्टी समोर येतील, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. 2007 च्या करारात बँक हमीचा समावेश होता. सोबतच गुणवत्तेचं हमीपत्रदेखील घेण्यात आलं होतं. मात्र नव्या करारात यांचा उल्लेख नाही, असं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. नरेंद्र मोदी घाबरले असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राफेल डीलमधलं सत्य समोर येईल याची मोदींना भीती वाटते. नोकरशहा, हवाई दल, संरक्षण मंत्रालयातील अनेकांना याबद्दलची कल्पना आहे. राफेल प्रकरणात चोरी झाली, याची सर्वांना कल्पना आहे. जर यामध्ये घोटाळा झाला नसता, तर संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करायला हरकत नव्हती. मात्र मोदी सरकार घाबरलं असल्यानं त्यांनी संयुक्त संसदीय समितीसमोर हा विषय नेला नाही, असा दावा त्यांनी केला.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा