शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 09:51 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. काल काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली.

चार दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काल काँग्रेसच्या हायकमांडची उमेदवारीबाबत दिल्लीत बैठक झाली, आज काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करु शकते. 

काल गुरुवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने  ४० उमेदवारांची नावे निश्चित केली. या यादीत राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. मात्र, यावेळी राहुल गांधी आपल्या पारंपरिक मतदारसंघातून अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही यावर सस्पेन्स आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई यांचेही नाव निवडणुकीच्या शर्यतीत आहे. रायबरेलीवरही पक्षाची लक्ष आहे.

दुरावलेला मित्र पुन्हा भाजपाशी मैत्री करणार?; लोकसभा निवडणुकीत NDA ची ताकद वाढणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईसी बैठकीत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ६० लोकसभा जागांवर चर्चा झाली. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि लक्षद्वीपच्या लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचाही उमेदवारांच्या यादीत समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

केरळमध्ये पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीने वायनाड मतदारसंघासाठी राहुल गांधींचे नाव सुचवले आहे. राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, राहुल गांधी वायनाडशिवाय अमेठीच्या त्यांच्या जुन्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्हीडी साठेसन यांनी सांगितले की, पक्ष केरळमध्ये १६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर मित्रपक्ष चार जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सठेसन यांनी सांगितले की, सीईसीने १६ जागांसाठी कोण उमेदवार असतील हे ठरवले आहे. एआयसीसी आज उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे.

कर्नाटकवर अजुनही निर्णय नाही

कर्नाटकात ४-५ जागांवर एकमत होऊ शकले नाही. येथे अंतिम निर्णय सर्वोच्च नेतृत्वाला घ्यायचा आहे. या बैठकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गुलबर्गा जागेवर चर्चा झाली नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी हे तिकीटाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. खरगे यांनी स्वत: या जागेवरून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. खर्गे हे राज्यसभा सदस्य असून त्यांचा ४ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूर विधानसभा मतदारसंघातून खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकला आहे. प्रियांक कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. खर्गे यांचे जावई दोड्डामणी यांना तिकीट मिळाल्यास ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक