शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 09:51 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. काल काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली.

चार दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काल काँग्रेसच्या हायकमांडची उमेदवारीबाबत दिल्लीत बैठक झाली, आज काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करु शकते. 

काल गुरुवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने  ४० उमेदवारांची नावे निश्चित केली. या यादीत राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. मात्र, यावेळी राहुल गांधी आपल्या पारंपरिक मतदारसंघातून अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही यावर सस्पेन्स आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई यांचेही नाव निवडणुकीच्या शर्यतीत आहे. रायबरेलीवरही पक्षाची लक्ष आहे.

दुरावलेला मित्र पुन्हा भाजपाशी मैत्री करणार?; लोकसभा निवडणुकीत NDA ची ताकद वाढणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईसी बैठकीत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ६० लोकसभा जागांवर चर्चा झाली. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि लक्षद्वीपच्या लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचाही उमेदवारांच्या यादीत समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

केरळमध्ये पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीने वायनाड मतदारसंघासाठी राहुल गांधींचे नाव सुचवले आहे. राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, राहुल गांधी वायनाडशिवाय अमेठीच्या त्यांच्या जुन्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्हीडी साठेसन यांनी सांगितले की, पक्ष केरळमध्ये १६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर मित्रपक्ष चार जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सठेसन यांनी सांगितले की, सीईसीने १६ जागांसाठी कोण उमेदवार असतील हे ठरवले आहे. एआयसीसी आज उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे.

कर्नाटकवर अजुनही निर्णय नाही

कर्नाटकात ४-५ जागांवर एकमत होऊ शकले नाही. येथे अंतिम निर्णय सर्वोच्च नेतृत्वाला घ्यायचा आहे. या बैठकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गुलबर्गा जागेवर चर्चा झाली नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी हे तिकीटाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. खरगे यांनी स्वत: या जागेवरून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. खर्गे हे राज्यसभा सदस्य असून त्यांचा ४ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूर विधानसभा मतदारसंघातून खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकला आहे. प्रियांक कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. खर्गे यांचे जावई दोड्डामणी यांना तिकीट मिळाल्यास ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक