शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 09:51 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. काल काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली.

चार दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काल काँग्रेसच्या हायकमांडची उमेदवारीबाबत दिल्लीत बैठक झाली, आज काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करु शकते. 

काल गुरुवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने  ४० उमेदवारांची नावे निश्चित केली. या यादीत राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. मात्र, यावेळी राहुल गांधी आपल्या पारंपरिक मतदारसंघातून अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही यावर सस्पेन्स आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई यांचेही नाव निवडणुकीच्या शर्यतीत आहे. रायबरेलीवरही पक्षाची लक्ष आहे.

दुरावलेला मित्र पुन्हा भाजपाशी मैत्री करणार?; लोकसभा निवडणुकीत NDA ची ताकद वाढणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईसी बैठकीत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ६० लोकसभा जागांवर चर्चा झाली. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि लक्षद्वीपच्या लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचाही उमेदवारांच्या यादीत समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

केरळमध्ये पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीने वायनाड मतदारसंघासाठी राहुल गांधींचे नाव सुचवले आहे. राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, राहुल गांधी वायनाडशिवाय अमेठीच्या त्यांच्या जुन्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्हीडी साठेसन यांनी सांगितले की, पक्ष केरळमध्ये १६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर मित्रपक्ष चार जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सठेसन यांनी सांगितले की, सीईसीने १६ जागांसाठी कोण उमेदवार असतील हे ठरवले आहे. एआयसीसी आज उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे.

कर्नाटकवर अजुनही निर्णय नाही

कर्नाटकात ४-५ जागांवर एकमत होऊ शकले नाही. येथे अंतिम निर्णय सर्वोच्च नेतृत्वाला घ्यायचा आहे. या बैठकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गुलबर्गा जागेवर चर्चा झाली नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी हे तिकीटाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. खरगे यांनी स्वत: या जागेवरून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. खर्गे हे राज्यसभा सदस्य असून त्यांचा ४ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूर विधानसभा मतदारसंघातून खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकला आहे. प्रियांक कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. खर्गे यांचे जावई दोड्डामणी यांना तिकीट मिळाल्यास ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक