शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

राहुल गांधी चुकीचं बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांचा संसदेत नंगानाच; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 11:53 IST

सरकारी कर्मचारी संपावर जातायेत, शेतकरी लॉंग मार्च काढतायेत याचा अर्थ महाराष्ट्रात खदखद आहे असंही संजय राऊत म्हणाले.

नवी दिल्ली - या देशात लोकशाहीची रोज हत्या होते. राहुल गांधी काही चुकीचे बोलले नाहीत. राज्यसभेत काल बोलताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा माईक बंद केला. आम्हाला बोलू दिले जात नाही. ही लोकशाहीची गळचेपी नाही का? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, या देशातील संसदेत आणि संसदेबाहेर राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव सुरू आहे त्याविरोधात व्यासपीठ मिळाल्यावर राहुल गांधी बोलले. संसदेत कालच्या गोंधळाला सुरुवात कुणी केली ते पाहा. राहुल गांधीनिमित्त आहे. गौतम अदानी आणि मोदी संदर्भावर चर्चा घडू नये यासाठी दोन्ही सभागृहात सत्ताधारी पक्षाने नंगानाच केला असा घणाघात त्यांनी भाजपावर केला. 

ही लढाई अन्यायाविरोधात, जनता रस्त्यावर उतरलीयसरकारी कर्मचारी संपावर जातायेत, शेतकरी लॉंग मार्च काढतायेत याचा अर्थ महाराष्ट्रात खदखद आहे. जनतेच्या मनातील सरकार असते तर रस्त्यावर जनता उतरली नसती. जनतेच्या विरोधात हे सरकार आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेली ही सत्तासंघर्षाची लढाई नाही. ज्यांनी आमच्यावर डाका, दरोडा घातलाय आणि त्याला केंद्र सरकारने पाठिंबा दिलाय त्या अन्यायाविरोधात ही सुनावणी आहे. दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपलेला आहे. या आठवड्यात निकाल लागायला हरकत नाही असं संजय राऊतांनी सांगितले. हे तर योद्ध्यांचे कर्तव्य सुभाष देसाई हे आदर्श नेते आहेत. त्यांनी काल स्पष्ट केले आहे. त्यांच्या मुलाने पक्षप्रवेश केल्याने काही फरक पडत नाही. मिंदे गटाला आनंद वाटतोय पण ही ओझी पुढे काय करायचं हा प्रश्न आहे. ही वॉशिंग मशिन बिघडेल इतका कचरा भाजपा आत टाकताय. प्रवेश होऊ द्या अजून काही होऊ द्या. त्यामुळे शिवसेना वाढीवर, विस्तारावर, जनमानसावर काही परिणाम होणार आहे. संघर्षात उतरल्यानंतर अशा प्रसंगाला सामोरं जाणं हे योद्धाचं कर्तव्य असते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही त्यासाठी तयार आहोत असं सांगत राऊतांनी भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा