शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Rahul Gandhi Budget 2023:'मित्र काल' बजेट, देशाचे भविष्य घडविण्यासाठी सरकारकडे रोडमॅप नाही; राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:40 IST

Union Budget 2023: केंद्र सरकारने अर्थसंकल्पाचे वर्णन 'अमृतकाल बजेट' असे केले आहे.

Rahul Gandhi On Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (1 फेब्रुवारी) 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसह महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात टीव्ही, मोबाईलसह EV कार स्वस्त झाल्या आहेत, तर सोने-चांदीसह काही गोष्टी महाग झाल्या आहेत. आता या अर्थसंकल्पावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

केंद्र सरकारने अर्थसंकल्पाचे वर्णन 'अमृतकाल बजेट' असे केले आहे, तर राहुल गांधींनी या अर्थसंकल्पाला 'मित्रकाळ'चा अर्थसंकल्प म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, "मित्रकाळाच्या अर्थसंकल्पात नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट नाही, महागाईला तोंड देण्यासाठी कोणतीही योजना नाही, विषमता दूर करण्याचा हेतू नाही. 1% श्रीमंतांकडे 40% संपत्ती, 50% गरीब 64% GST भरतात, 42% तरुण बेरोजगार आहेत, तरीही, पंतप्रधानांना त्याची चिंता वाटत नाही. या अर्थसंकल्पाने सिद्ध केले की, भारताचे भविष्य घडविण्यासाठी सरकारकडे कोणताही रोडमॅप नाही," असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

काँग्रेस नेत्यांची अर्थसंकल्पावर टीका काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही अर्थसंकल्पावर टीका करताना सरकारवर निशाणा साधला आहे. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "दोन-चार राज्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. हा जुमला अर्थसंकल्प आहे. महागाई रोखण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. रोजगारासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. नोकर भरतीसाठी आणि गरिबांसाठी या बजेटमध्ये काहीही नाही.''

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, ''गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, शिक्षण, मनरेगा आणि अनुसूचित जातींच्या कल्याणाशी संबंधित तरतूदींची प्रशंसा झाली होती. आज वास्तविक खर्च बजेटपेक्षा खूपच कमी आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले, "हा अर्थसंकल्प देशाच्या बेरोजगारी आणि महागाईच्या खर्‍या भावनेला संबोधित करणारा नाही. त्यात भलत्याच घोषणा होत्या, ज्या यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. पीएम किसान योजनेचा फायदा केवळ विमा कंपन्यांना झाला आहे, शेतकऱ्यांना नाही."

काँग्रेस नेत्यांनी कौतुकही केलेकाँग्रेसच्या काही नेत्यांनीही अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "अर्थसंकल्पात काही चांगल्या गोष्टी आहेत, पण मनरेगा, गरीब ग्रामीण मजूर, रोजगार आणि महागाई यांचा उल्लेख नव्हता. काही मूलभूत प्रश्न अनुत्तरीत राहिले."

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले, "मी कमी कर प्रणालीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे कोणत्याही कर कपातीचे स्वागत आहे, कारण लोकांच्या हातात जास्त पैसा ठेवणे हा अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budgetअर्थसंकल्प 2023