शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 13:14 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील राजकारणावरुन राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. लोकसभेतही या सत्तासंघर्षाचा परिणाम पाहायला मिळाला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे. 

लोकसभेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकारणावरुन राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. 'मला सभागृहामध्ये काही प्रश्न विचारायचे होते. मात्र आता त्याला काही अर्थ नाही कारण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधीपक्षाच्या नेत्यांनी 'संविधानची हत्या बंद करा, बंदा करा' अशी घोषणाबाजी केली आहे. 

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रियंका गांधी यांनी सोमवारी (25 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर टीका केली आहे. 'जनादेशाच्या खुल्या अपहरणाच्या युगात आपण पोहोचलो आहोत की काय?' असा सवाल प्रियंका यांनी केला आहे. 'भाजपाने महाराष्ट्रात देशाची राज्यघटना व घटनात्मक संस्थांना ठेंगा दाखवून कर्नाटकातील सत्तेच्या खेळाची पुनरावृत्ती सुरू केली आहे, असं टीव्हीवर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्यासाठी भाजपा सरकारच्या खिशातून कधी मदत निघाली नाही' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं असून, आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालय उद्या त्यावर निर्णय देणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचं पत्र देऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते पत्र ग्राह्य धरू नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्र दिलेलं आहे.

महाराष्ट्रात राज्यपालांच्या समोर आमच्या 162 आमदारांचं समर्थन सिद्ध करू. राज्यपालांसमोर आमची परेड करण्याची तयारी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह अपक्षांच्या सह्यांची यादी सोबत जोडलेली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे 162 हे पुरेसं संख्याबळ आहे. बहुमताला 144 आमदारांची गरज आहे. त्यामुळे तात्काळ आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्यात यावं, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाdemocracyलोकशाहीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस