शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

सरकार आणि पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; केंद्र-राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 1:34 AM

निझामुद्दीमन मरकजमधील शेकडो जणांना कोरोनाची लागण झाल्याची भिती आरोग्य मंत्रालयास आहे.

नवी दिल्ली : निझामुद्दीम तबलिकी मरकजमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात हजारो जण सहभागी झाल्यानंतर देशभर पसरले. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या त्यामुळे गेल्या दोन दिवसांत झपाट्याने वाढली आहे. परदेशातून या कार्यक्रमात येणाऱ्यांना व्हिसा देणे, इतक्या मोठ्या जमावाला परवानगी देणे व लॉकडाऊन झाल्यानंतरही हा परिसर रिकामा न करणे - यामुळे परराष्ट्र मंत्रालय, राज्य सरकार व दिल्ली पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

निझामुद्दीमन मरकजमधील शेकडो जणांना कोरोनाची लागण झाल्याची भिती आरोग्य मंत्रालयास आहे. शिवाय असंख्य लोकांनी प्रवासही केल्याने इतर राज्यांनाही धोका वाढला आहे. आरोग्य आणीबाणीची स्थिती देशात असताना मरकजमध्ये जमलेल्यांना क्वारंटाईन करण्यास विलंब झाल्याची कबुली आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

फेब्रुवारीपासून भारतात आलेल्या देशी-विदेशी नागरिकास १४ दिवस सक्तीचे क्वारंटाईन करण्यात आले. मात्र मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले नाही. शिवाय खोलीत आठ ते दहा जण राहत होते. ही बाबदेखील गृह विभागाच्या अखत्यारित येणाºया दिल्ली पोलिसांकडून सुटली. कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हा कार्यक्रम तात्काळ रोखण्याची, सहभागी झालेल्यांची चाचणी करण्याची जबाबदारी कुणाची यावरही वाद सुरू झाला आहे.

संपूर्ण देशभर कोरोनाचा शिरकाव झाला होता. मात्र लॉकडाऊनमुळे कोरोनावर बºयापैकी नियंत्रण राखण्यात सरकारला यश आले. रूग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आयसीएमआरने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार भारताने अद्याप कोविड १९ चाचणीसाठी ३८ टक्केच क्षमता वापरली आहे. आता मात्र सर्व संसाधने, चाचणीची क्षमता पूर्ण वापरावी लागेल, असा अंदाज आयसीएमआरमधील सूत्रांनी वर्तवला.

14 दिवस क्वारंटाईन

इंडोनेशिया, बांगलादेशासह आशियाई देशातून तबलिकी जमातचे लोक आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते दिल्लीत दाखल झाल्याने तेव्हाच त्यांना क्वारंटाईन करण्याचा आदेश परराष्ट्र मंत्रालयाने का दिला नाही, यावरूनही सरकारमध्ये चर्चा रंगली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली