शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Punjab Assembly Election 2022 : पंजाब देणार प्रस्थापितांना धक्का; काँग्रेस अन् ‘आप’मध्ये टक्कर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 08:50 IST

काँग्रेसने निवडणुकीच्या चार महिने आधी चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करून जनतेचा रोष कमी केला, त्यातच चन्नी यांनी १११ दिवसांत ५० मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णयांचा धडाका लावल्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.

यदु जोशी - 

चंडीगड : गेली दोन दशके प्रस्थापित घराण्यांची सत्ता अनुभवलेला पंजाब यावेळी मात्र प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदरसिंग या दोन्ही प्रस्थापितांना खो देताना दिसत आहे. मुख्य लढत ही काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये होत असून किसान आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे किसान आंदोलनात अत्यंत सक्रिय राहिलेल्या संयुक्त समाज मोर्चाची निवडणुकीतील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहील असे मानले जात आहे. बादल यांचा शिरोमणी अकाली दल स्वबळावर लढत आहे. भाजप-अमरिंदसिंग यांची पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव ढिंढसा यांचा अकाली दल संयुक्त या तीन पक्षांची युती आहे. आम आदमी पार्टीने काँग्रेसची झोप उडविली आहे. नवमतदार, बदल हवा असलेला मतदार ‘आप’ला पसंती देताना दिसत आहे.

आप’ची पाटी कोरी आहे. सगळ्या प्रस्थापितांची कुठे ना कुठे हात मिळवणी आहे, आम्ही तुम्हाला दमदार उत्तम पर्याय देणार असे या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान सांगत आहेत. आप सोडून सगळेच प्रस्थापित असून ते एकमेकांची पापं झाकत राहतील. पंजाबमध्ये स्वच्छ सरकार हवे असेल तर आपकडे चला अशी भावना येथील मतदार व्यक्त करताना दिसतात. बरेच जण ‘आप’ला ‘डार्क हॉर्स’ समजत आहेत. दिग्गजांना पटकणी देऊन बदल घडवून आणण्याची खुमखुमी पंजाबच्या मतदारांना नेहमीच राहिली आहे. अशा वर्गाचा कल ‘आप’कडे दिसतो.  

चन्नी हे दलित आहेत, पंजाबमध्ये दलितांची ३५ ते ४० टक्के मते आहेत. केवळ दलित नेता असा ठप्पा स्वत:वर मारून न घेता सर्वसमावेशक होण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. चन्नी यांना आधी मुख्यमंत्री अन् नंतर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असे दोन्ही निर्णय काँग्रेसने घेतले नसते तर अँटिइन्कमबन्सीचा मोठा फटका बसून आम आदमी पार्टीचा फायदा झाला असता. मात्र निवडणुकीआधीच हे दोन निर्णय घेऊन शर्यतीचा मोठा भाग काँग्रेसने जिंकला, असे मत लुधियाना सुधार प्रन्यासचे अध्यक्ष रमण बालसुब्रह्मण्यम यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. 

काँग्रेसचा निर्णयांचा धडाका-    काँग्रेसने निवडणुकीच्या चार महिने आधी चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करून जनतेचा रोष कमी केला, त्यातच चन्नी यांनी १११ दिवसांत ५० मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णयांचा धडाका लावल्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.  -    पंजाबवर गेली दोन दशके घराणेशाहींचीच सत्ता राहिली.  बादल कुटुंब व पटियालाचे महाराजा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सत्ता भोगली. एकमेकांवर घोटाळे वा इतर कोणत्याही कारणांसाठी कारवाई होऊ द्यायची नाही याची पद्धतशीरपणे काळजी घ्यायचे अंडरस्टँडिंग दोघांमध्ये होते. 

किसान आंदोलन अन् शरद जोशींची आठवण महाराष्ट्रात शरद जोशी यांच्या शेतकरी आंदोलनांना अभूतपूर्व पाठिंबा मिळत असे. मात्र, त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली तेव्हा ते दोन मतदारसंघांमधून हरले. तशीच स्थिती पंजाबमध्ये दिसत आहे. किसान आंदोलनाला भरभरून प्रतिसाद मिळाला, पण त्यातून निर्माण झालेल्या संयुक्त समाज मोर्चाला चारदोन जागाही मिळणार नाहीत, असे राजकीय अभ्यासकांना वाटत आहे.

अकाली दलाची तुलना राष्ट्रवादीशी आपल्याकडे निवडून येण्याची क्षमता असलेले किमान ३०-३५ चेहरे असणे हे जसे  राष्ट्रवादी काँग्रेसचे  बळ आहे तशीच स्थिती  अकाली दलाची  पंजाबमध्ये आहे. अशा पाचपंचवीस उमेदवारांवर त्यांची मदार आहे. ते जिंकले तर भाजपप्रणीत आघाडीला सोबत घेऊन सत्तेत येण्याचा अकाली दलाचा गेम प्लॅन असेल.  

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसAAPआप