शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:03 IST

Punjab Floods Update: चार दशकांनंतर पंजाबमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सतलज, व्यास या नद्यांच्या रौद्रवतारामुळे पंजाबमध्ये महापूर आला आहे. 

Punjab Floods: गेल्या महिन्याभरापासून पंजाबवर आस्मानी संकटाचा सामना करत आहे. राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि रावी, सतलज, व्यास नद्यांचा रौद्रवतार यामुळे अर्धे पंजाब पाण्यात बुडाले आहे. १३०० गावांना पुराने वेढा दिला असून, पाऊस आणि पुरामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक घरंदार सोडून सुरक्षित स्थळी गेले आहेत.  

पंजाबमध्ये महापुरामुळे हाहाकार उडाला असून, पिकं पूर्ण पाण्यात सडली आहेत. घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. 

अमृतसरला सर्वाधिक फटका

पाऊस आणि पुराचा अमृतसर जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. ३५ हजार लोक बेघर झाले आहेत. त्यापाठोपाठ फिरोजपूर जिल्ह्यातही २४ हजार १५ लोकांना घर सोडून मदत शिबिरात जावं लागलं आहे. फाजिल्कामध्ये २१५६२, पठाणकोटमध्ये १५०५३, गुरुदासपूरमध्ये १४५००, होशियारपूरमध्ये ११५२, एसएएस नगरमध्ये ७०००, कपूरथलामध्ये ५६५०, मोगामध्ये ८००, जालंधरमध्ये ६५३, मानसामध्ये १६३ तर बरनालामध्ये ५९ लोकांना पुराचा फटका बसला आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती लोकांचा मृत्यू?

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे सर्वाधिक ६ बळी पठाणकोट जिल्ह्यात गेले आहेत. त्यापाठोपाठ अमृतसर, बरनाला, होशियारपूर, लुधियाना, मानसा आणि रुपनगर जिल्ह्यात प्रत्येकी ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यातही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पठाणकोटमध्ये ३ लोक बेपत्ता आहेत. 

१३०० गावांना पुराचा फटका

अर्ध्या पंजाबला महापुराचा फटका बसला आहे. पंजाबमधील १३०० गावांना पुराने वेढले असून, गुरूदासपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३२१ गावांना पुराने वेढले आहे. अमृतसरमध्ये ८८, बरनालामध्ये २४, फाजिल्कामध्ये ७२, फिरोजपूरमध्ये ७६, होशियारपूरमध्ये ९४, जालंधरमध्ये ५५, कपूरथलामध्ये ११५, मानसामध्ये ७७, मोगामध्ये ३९, पठाणकोटमध्ये ८२ यासह इतर जिल्ह्यातील गावांचाही यात समावेश आहे. पुरामुळे २ लाख ५६ हजार लोक विस्थापित झाले आहेत. 

पुरामुळे चंदीगढ आणि पंजाबमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ३ सप्टेंबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 

टॅग्स :floodपूरPunjabपंजाबRainपाऊसriverनदीDeathमृत्यू