शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

CAA Protest : नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामुळे दिल्लीत आगडोंब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 6:35 AM

Citizen Amendment Act Protest : आंदोलक आक्रमक : बस जाळल्या, पोलिसांशी संघर्ष, निमलष्करी जवान तैनात

उमेश जाधव/सुमेध बनसोड ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना, रविवारी देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेंड््स कॉलनी भागात आंदोलकांनी दिल्ली परिवहन महामंडळाच्या चार बस व पोलिसांची सहा वाहने जाळली. तो आगडोंब विझविताना अग्निशमन दलाचे तीन जवान व सहा पोलीस जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले. या हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि दक्षिण दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये घबराट पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात निमलष्करी दलांचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या हिंसाचाराचा निषेध केला व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.अनेक ठिकाणी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाल्यावर सौम्य लाठीमारही करण्यात आला. पोलिसांनी जामिया मिलिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिरून अश्रुधुराची नळकांडी फोडली. काही विद्यार्थ्यांना लाठीमार करत कॅम्पसच्या बाहेर ओढून आणण्यात आले. हात वर केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पोलीस हॉस्टेल व ग्रंथालयातून बाहेर घेऊन येताना दिसले. पोलिसांनी विनापरवाना कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना बळजबरीने बाहेर काढले, असा आरोप विद्यापीठाचे चीफ प्रॉक्टर वासीम अहमद खान यांनी केला.

मूळच्या नागरिकत्व कायद्यातील दुरुस्त्या मंजूर झाल्यानंतर लगेचच जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केले होते. ते लक्षात घेऊन विद्यापीठाने सर्व परीक्षा रद्द करून ५ जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरुण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली.

जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नाही. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले व बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव सैमन फारुकी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, आंदोलक मथुरा रोडवर शांततापूर्ण आंदोलन करत होते. आंदोलक-पोलिसांमध्ये वाद झाला. तणावात त्यामुळे वाढ झाली. पोलिसांनी लाठीमार सुरू केला. संतप्त जमावाने त्यामुळे बसेस जाळल्या.या आंदोलन व हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रोची जामिया, सुखदेव विहार, जसोला, शाहीन बाग व आश्रम रोडसह तेरा स्थानके संध्याकाळनंतर बंद करण्यात आली व गाड्यांचे तेथील थांबेही रद्द करण्यात आले. अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली.हिंसेमागे काँग्रेसचा हात - मोदीनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात ईशान्य भारतात सुरू असलेले हिंसक आंदोलन पेटविण्यामागे काँग्रेसचा हात आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला आहे.विधेयकात सुधारणा करू- शहानागरिकत्व दुरुस्ती कायद्यात आवश्यकता असल्यास आणखी काही सुधारणा करण्यात येतील. मेघालयाच्या प्रश्नांवर नक्की तोडगा काढू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

टॅग्स :delhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक