शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आंदोलक शेतक-यांची रेल्वे १६० किलोमीटर भरकटली, दिल्लीच्या मोर्चाहून परत येतानाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:02 AM

बिनमोर (मध्य प्रदेश) : नवी दिल्ली येथून भारतीय किसान संसदेचा मोर्चा आटोपून आंदोलक शेतक-यांना घेऊन कोल्हापूरकडे परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी तब्बल १६० किलोमीटर भरकटली

संतोष बामणेबिनमोर (मध्य प्रदेश) : नवी दिल्ली येथून भारतीय किसान संसदेचा मोर्चा आटोपून आंदोलक शेतक-यांना घेऊन कोल्हापूरकडे परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी तब्बल १६० किलोमीटर भरकटली. बिनमोर (मध्य प्रदेश) स्टेशन आल्यानंतर ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. सिग्नल नियंत्रण यंत्रणेच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाल्यावर शेतकºयांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून संताप व्यक्त केला.नवी दिल्लीत काढण्यात आलेल्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ या १८ बोगींच्या रेल्वेतून दोन हजार शेतकरी गेले होते. मोर्चा संपल्यानंतर मंगळवारी रात्री सफदरगंज स्थानकातून ही गाडी कोल्हापूरकडे रवाना झाली. सकाळी साडेसात वाजता मध्य प्रदेशमधील बिनमोर रेल्वेस्थानकात ती आली. यावेळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी ही गाडी पुढे सोडली नाही. गाडी का थांबली, याबाबतची विचारणा केल्यावर शेतकºयांना हा प्रकार समजला. आग्रा रेल्वे स्टेशनच्या सिग्नल नियंत्रण यंत्रणेच्या चुकीमुळे गाडी तब्बल १६० किलोमीटर अंतर कापून चुकीच्या दिशेने आली होती. संतप्त शेतकºयांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून मोदी सरकार व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर रेल्वे पुन्हा बिनमोर -झासी - ग्वालियर - बिना - भोपाळ -मनमाड - भुसावळ - दौंड - पुणे मार्गे वळविण्यात आली. गुरुवारी रात्रीपर्यंत कोल्हापूरला पोहोचणे अपेक्षीत आहे.>चौकशी करालाखोंच्या संख्येने शेतकरी मोर्चासाठी आले होते. परंतु, रेल्वे प्रशासनाच्या गलथानपणामुळे १५०० हून अधिक शेतकºयांचा जीव धोक्यात आला. याच्यामागे कोणाचा हात आहे, त्याची सखोल चौकशी करावी, अन्यथा ‘स्वाभिमानी’शी गाठ आहे.- खासदार राजू शेट्टी.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनNew Delhiनवी दिल्ली